शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

'यांचं' राजकारण एकदा मोडीतच काढा! औरंगाबादच्या नामांतरासह राज यांच्या PM मोदींकडे 3 मोठ्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 1:50 PM

राज ठाकरे म्हणाले, यांना संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून केवळ याच गोष्टी करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झाले, संभाजीनगर असे नाव झाले, की मग प्रश्नच मिटला.

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि न झालं काय, मी बोलतोय ना, अरे तू कोण? तू कुणी वल्लभ भाई पटेल आहे, की महात्मा गांधी? तू कोण आहे, मी बोलतोय ना? मी बोलतोय काय लॉजिक आहे? इतके दिवस केंद्रास सत्ता होती संभाजीनगरच्या नामांतराचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो निवडणुकीच्या दृष्टीने सतत जीवंत ठेवायचा आहे आणि त्यावरून मतं मिळवायची आहेत. अशा शब्दात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. याच वेळी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्याही केल्या.

राज ठाकरे म्हणाले, यांना संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून केवळ याच गोष्टी करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झाले, संभाजीनगर असे नाव झाले, की मग प्रश्नच मिटला. मग बोलायचे कशावर? राज्यात अनेक शहरांत १०-१० दिवस पाणी येत नाही. संभाजीनगरात येत नाही, जालन्यात येत नाही, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाही. ते विषयच नाही. 

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे समजत नाही. आमचं खरं हिंदूत्व, यांचं खोटं हिंदूत्व? तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का? खरं हिंदुत्व काय आहे, याचे रिझल्ट पाहीजेल आहेत लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना आम्ही रिझल्ट देतो. आंदोलांसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मला सांगावे, की तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का हो? मग ती मराठीच्या  प्रश्नावर असेल किंवा हिंदूत्वाच्या प्रश्नावर, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. ९२-९३ ला दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरच फक्त सुरू, असेही राज म्हणाले.

पंतप्रधानांकडे राज यांच्या तीन मागण्यात -राज म्हणाले, मी मागे एका सभेत बोललो होतो, की पंतप्रधान मोदींना विनंती आहे, की या देशात त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. या देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठीही एक नवा कायदा आणावा आणि माझी तिसरी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना, की या औरंगाबादचे लवकरात लवकर 'संभाजीनगर', असे नामांतर करून टाका आणि यांचे राजकारण एकदा मोडीतच काढा. 

हेही वाचा -अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!

"शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर यापलीकडे काय बोलायचं?"; राज ठाकरेंचं टीकास्त्र 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसे