अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाने दिले तिघांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:33 PM2019-09-19T18:33:45+5:302019-09-19T18:35:28+5:30

अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला. या तरुणामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

brain dead youth gave new life to three people | अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाने दिले तिघांना जीवनदान

अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाने दिले तिघांना जीवनदान

googlenewsNext

पुणे : आजीकडे जात असताना अचानक बुलेट घसरून तो कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा "ब्रेनडेड" झाला. अशा परिस्थितीत त्याचे इतर अवयव हे एखाद्या गरजू रूग्णाचा जीव वाचवू शकतात याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनी देखील आपला तरूण मुलगा गेला आहे याचे दुःख पचवत त्याचे पाच अवयव दान केले. त्यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.  

विश्रांतवाडी येथील भिमनगर येथे राहणारा मयूर शहाजी मातंग (वय 23)याचा 15 सप्टेंबर रोजी काॅमर्सझोन चौकात बुलेट घसरून अपघात झाला. भिमनगर येथून मेंटल कार्नर येथे आजीच्या घरी जात असताना हा गंभीर अपघात झाला. येरवडा पोलिसांनी अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. रूग्णालयात दाखल केल्यावर त्याला मेंदूला जबर मार लागल्याने तो ब्रेनडेड झाला होता. मात्र त्याचे इतर अवयव हे गरजू रूग्णांसाठी उपयोगाचे होते. नगररोड येथील  सह्याद्री रूग्णालयाच्या डाॅक्टरांनी त्याच्या पालकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अवयवदानानंतर आपला मुलगा एखाद्याला जीवदान देवू शकतो. हे समजल्यानंतर त्याच्या पालकांच्या संमतीने त्याचे हदय,लिव्हर,स्वादुपिंड व दोन किडण्या असे पाच अवयव दान करण्यात आले. 

विशेष म्हणजे मयूर हा अत्यंत गरीब कुटुबांतील मुलगा.आई,वडील व तीन भावडांसह भिमनगर येथे वास्तव्यास होता. मजूरी करून जीवनाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्व सामान्य कुटुंबाने आपल्या तरूण मुलाचे अवयव दान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. याबाबत सह्याद्री रूग्णालयाचे न्यूरोसर्जन डाॅ. सचिन महाजन म्हणाले, मयूर मांतग हा तरूण अपघातात डोक्याला गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. तपासणीनंतर त्यांच्या मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे तो ब्रेनडेड झाला होता. अशा परिस्थितीत रूग्णाचा मेंदू पूर्णपणे निकामी(मृत) झाला होता. मात्र त्याच्या शरिरातील इतर अवयव हे सुस्थितीत व इतर गरजूंना रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार होते. सह्याद्री रूग्णालयातील डाॅक्टर व समुपदेशकांनी अवयवदानाचे महत्व पटवून दिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या संमतीने त्याचे पाच अवयव दान करण्यात आले. या दुर्दैवी अपघातात मयूर जरी गेला असला तरी "तो" त्याने दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून  जिवंतच राहणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबियांने तरूण मुलाचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श दिला आहे.

Web Title: brain dead youth gave new life to three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.