शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
4
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
5
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
6
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
7
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
8
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
9
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
10
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
11
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
12
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
13
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
14
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
15
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
16
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
17
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
18
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
19
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
20
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादनावर बोगस खरेदीखतांचे सावट; प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:46 IST

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी आणि मुंजवडी या सात गावांतील २८३२ हेक्टर जमीन संपादनाचे मूळ नियोजन होते.

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येत असतानाच बोगस खरेदीखतांचे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळाच्या जागेसाठी सात गावांतील १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेण्यात आला असून, यापैकी ९३ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, बोगस खरेदीखतांमुळे खरे शेतकरी आणि बाहेरगावचे खरेदीदार यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी आणि मुंजवडी या सात गावांतील २८३२ हेक्टर जमीन संपादनाचे मूळ नियोजन होते. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता सरकारने १३८८ हेक्टर क्षेत्र वगळून १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेतला. यासाठी रेडी रेकनरच्या चारपट मूल्य आणि १० टक्के जमिनीचा परतावा देण्याचे ठरले आहे. यानंतर भूसंपादनाला वेग आला असून, मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर येथील ३२३ हेक्टर जमिनीची मोजणी पोलिस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बोगस खरेदीखतांचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आली असून, आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक दलाल, काही वकील, स्टॅम्प व्हेंडर, साक्षीदार आणि तलाठी यांनी संगनमताने पुणे-मुंबईतील खरेदीदारांना गाठून बोगस व्यवहार केल्याचा आरोप आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनीही पडद्यामागून मदत केल्याची चर्चा आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप

प्रशासनाचा दावा आहे की, ९३ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की, यातील बहुतांश जमिनी बाहेरगावच्या खरेदीदारांनी नफ्यासाठी खरेदी केल्या आहेत. यामुळे संमती देणाऱ्यांची टक्केवारी जास्त दिसत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, १० टक्के जमिनीचा परतावा फक्त खऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, बाहेरगावच्या खरेदीदारांना नव्हे.

पुरावे असल्यास तक्रार द्या

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस खरेदीखतांचे पुरावे असल्यास तक्रार द्यावी, त्यावर योग्य कारवाई केली जाईल. फसवणूक झाल्यास फौजदारी कारवाईही होईल, असे डुडी यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने बोगस खरेदीखते शोधण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

विमानतळ विरोधी समितीचे आवाहन

विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्ताशेठ झुरंगे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, फसवणूक झाल्यास तातडीने जिल्हाधिकारी किंवा सासवड पोलिस ठाण्याकडे तक्रार करावी. खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळ