शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादनावर बोगस खरेदीखतांचे सावट; प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:46 IST

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी आणि मुंजवडी या सात गावांतील २८३२ हेक्टर जमीन संपादनाचे मूळ नियोजन होते.

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येत असतानाच बोगस खरेदीखतांचे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळाच्या जागेसाठी सात गावांतील १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेण्यात आला असून, यापैकी ९३ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, बोगस खरेदीखतांमुळे खरे शेतकरी आणि बाहेरगावचे खरेदीदार यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी आणि मुंजवडी या सात गावांतील २८३२ हेक्टर जमीन संपादनाचे मूळ नियोजन होते. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता सरकारने १३८८ हेक्टर क्षेत्र वगळून १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेतला. यासाठी रेडी रेकनरच्या चारपट मूल्य आणि १० टक्के जमिनीचा परतावा देण्याचे ठरले आहे. यानंतर भूसंपादनाला वेग आला असून, मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर येथील ३२३ हेक्टर जमिनीची मोजणी पोलिस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बोगस खरेदीखतांचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आली असून, आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक दलाल, काही वकील, स्टॅम्प व्हेंडर, साक्षीदार आणि तलाठी यांनी संगनमताने पुणे-मुंबईतील खरेदीदारांना गाठून बोगस व्यवहार केल्याचा आरोप आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनीही पडद्यामागून मदत केल्याची चर्चा आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप

प्रशासनाचा दावा आहे की, ९३ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की, यातील बहुतांश जमिनी बाहेरगावच्या खरेदीदारांनी नफ्यासाठी खरेदी केल्या आहेत. यामुळे संमती देणाऱ्यांची टक्केवारी जास्त दिसत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, १० टक्के जमिनीचा परतावा फक्त खऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, बाहेरगावच्या खरेदीदारांना नव्हे.

पुरावे असल्यास तक्रार द्या

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस खरेदीखतांचे पुरावे असल्यास तक्रार द्यावी, त्यावर योग्य कारवाई केली जाईल. फसवणूक झाल्यास फौजदारी कारवाईही होईल, असे डुडी यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने बोगस खरेदीखते शोधण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

विमानतळ विरोधी समितीचे आवाहन

विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्ताशेठ झुरंगे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, फसवणूक झाल्यास तातडीने जिल्हाधिकारी किंवा सासवड पोलिस ठाण्याकडे तक्रार करावी. खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळ