शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एमपीएससी’च्या सर्व परीक्षांना बायोमेट्रिक हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:53 PM

यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवातबोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

पुणे : बोगस विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) आता मुख्य परीक्षांसह सर्व पुर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. यापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत वापरण्यात आली. तर रविवारी (दि. २३) पहिल्यांदाच आयोगाने महिला व बाल विकास विभागाच्या गट ब पदाच्या पुर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली. यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. थेट भरती, स्पर्धात्मक परीक्षा, विभागीय परीक्षा, मर्यादीत परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्याने थेट भरती व स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असते. स्पर्धात्मक परीक्षा या साधारणपणे पुर्व, मुख्य व मुलाखत या स्वरूपाच्या असतात. तर थेट भरती परीक्षांमध्ये पुर्व व मुलाखत अशी प्रक्रिया असते. पुर्व परीक्षेच्या तुलनेत मुख्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या खुप कमी असते. त्यामुळे आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवात केली. मागील काही महिन्यांत झालेल्या तीन ते चार परीक्षांसाठी ही हजेरी घेण्यात आली. पण पुर्व परीक्षेसाठी आतापर्यंत बायोमेट्रिकचा वापर करण्यात आला नव्हता. आयोगाकडे सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.रविवारी (दि. २३) आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक, अधिव्याख्याता, सांख्यिकी अधिकारी गट ब या पदांसाठी पुर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर बायोमट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. एखाद्या पुर्व परीक्षेसाठी पहिल्यांदाच अशी चाचपणी करण्यात आली. परीक्षा कक्षामध्ये जाण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि छायाचित्र घेण्यात आले. या प्रक्रियेनंतर ओळखपत्राच्या झेरॉक्सवर हॉलमार्क लावण्यात आले. त्यानंतरही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. तसेच परीक्षेवेळीही छापील छायाचित्रासमोर अंगठ्याचा ठसा घेतला गेला. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी हे नवीन होते. पण बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणGovernmentसरकार