शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:15 PM

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे

पुणे: देशातील दारूगोळा उत्पादन ४१ कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय मजदूर संघाने (Bharatiya Mazdoor Sangh) सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. भामसं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील देशातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे.

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे. केंद्र सरकारने या कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेताना घटनात्मक हक्कांचा भंग केला असल्याचा या संघटनांचा दावा आहे. यापैकी मद्रास उच्च न्यायालयातील दाव्यात न्यायाधिशांनी सरकारने कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घ्यावे असा आदेश दिला आहे. अन्य दाव्यांची सुनावणीही लवकर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान केंद्र सरकारने या ४१ कंपन्यांचे उत्पादनानुसार वर्गीकरण करून त्यांच्या ७ स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्याचा अध्यादेशही जारी केला आहे. त्यात आता देशी तसेच परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करू शकतात. या कंपन्यांच्या १०० पेक्षा जास्त उत्पादनांच्या खरेदीचे लष्करावर असलेले बंधनही केंद्र सरकारने काढून टाकले असून त्यामुळे कंपन्यांची स्थिती रोडावली आहे. लष्कराला लागणाऱ्या दारूगोळ्याची निर्मिती करणाऱ्या या कंपन्यांना ब्रिटिशांपासूनचा २०० वर्षांचा इतिहास आहे. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक युद्धात या कंपन्यांनी लष्कराला दारूगोळा तयार करून दिला आहे. आजमितीस या सर्व कंपन्यांमध्ये मिळून ८० हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात.एकूण ४१ पैकी ११ कंपन्या महाराष्ट्रात आहेत.

केंद्र सरकारने नियोजनबद्धतेने त्यांचे खासगीकरण केल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. तिनही संघटनांना एकत्र येऊन संपाचा इशारा दिला होता, सरकारने संप केल्यास, करण्यासाठी प्रवृ्त केल्यास १५ ते २५ हजार रूपयांचा दंड, त्याशिवाय शिक्षा असा अध्यादेश जारी करून कामगार संघटनांना संपाची बंदीच केली. त्याविरोधातही एआयडीईएफ तसेच इंटक यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. 

अन्य क्षेत्रातील कामगारांना असलेला संपाचा अधिकार आम्हाला नाकारणे हे अयोग्य आहे. मुळातच संरक्षण क्षेत्रातील अशा कंपन्या परदेशी कंपन्यांसाठी खुल्या करून देणे योग्य नाही. मात्र कामगारांचा संपाचा अधिकार काढून घेणे याला आमचा तीव्र विरोध आहे.

संजय मेनकुदळे, सदस्य, भामसं केंद्रीय कार्यकारिणी

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय