शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

‘मुळशी पॅटर्न’ मधील ‘ही ’ अभिनेत्री करते उत्तम शेती..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 8:02 PM

काही दिवस नोकरी व शेती अशी कसरतही केली. नंतर नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले..

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीेसाठी आग्रही : मानसिक समाधानाबरोबर पैसा व प्रसिध्दी शेतीमुळेच

विकास चाटी

पुणे : वडिलांची नोकरी सौदी अरेबियात असल्याने आई-वडिलांबरोबर ती अनेक तिथे वर्षे राहिली. पुढे ती आयटी इंजिनिअर झाल्यावर पुण्यातील एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली.काही दिवस आयटी क्षेत्रातील ग्लॅमर, पैसे बरे वाटले पण तरीही तिथे समाधान कुठे मिळेनासा असेच झालेले..यातून मनाची घुसमट सुरु झाली. निसर्गाशी जवळीकता वाढवणारी शेती तिला खुणावू लागली. तशी तिच्या आईवडिलांकडे थोडी शेती होती. मात्र त्या दोघांनीही कधी शेती करायचा विचार केला नव्हता. मालविकाने पगारातील पैशांमधून शिरुर येथे दीड एकर शेती विकत घेतली. मात्र, नुसतेच उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा प्रकार तिला करायचा नव्हता तसेच पारंपारिक शेतीही करायची नव्हती. तिच्या वाचनात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आले असल्याने तिने सेंद्रिय शेती करायचा निश्चय केला. आणि शेतीत रमलेली असताना तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली... तिचा अभिनय व नावाची सर्वत्र चर्चा जोर धरु लागली. ती ही मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री मालविका गायकवाड...

काही दिवस नोकरी व शेती अशी कसरतही केली. नंतर नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय केला. तिच्या या निर्णयाला नातेवाईक, मित्रांनी वेड्यात काढले. मात्र तिने त्या वेडालाच ध्यास बनविले. तिला तिच्यासारखेच सेंद्रिय शेती करणारे मित्रही मिळाले. मग काय! पहिल्यापासून रासायनिक खतांना, औषधांना फाटा देत तिने शेणखत, गोमुत्र यांचा शेतीत वापर सुरु केला. सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळवायचेच याचा ध्यासच घेतला. सतत तीन वर्षांपर्यंत अधिकाऱ्यांनी मातीच्या विविध तपासण्या करुन नन्नाचा पाढा लावला. मात्र त्यानंतर तिने पुढील वर्षी सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळविलेच.

.................

 सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर सेंद्रिय शेतमाल बाजारात विकता येत होता. मात्र बाजारसमितीत माल नेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून ‘ सब घोडे बारा टक्के ’ या न्यायाने सेंद्रिय शेतमालास रासायनिक मालाप्रमाणेच भाव मिळू लागला. अखेर अशा पद्धतीने विक्री फायदेशीर नाही हे लक्षात आले. मग तिच्यासह ४४२ सेंद्रिय शेतमाल उत्पादक मित्रांनी मिळून ‘ दी आॅर्गेनिक कार्बन प्रा. लि. ’ या नावाने कंपनी स्थापन केली. ‘हंपी ए-२ ’ या नावाने ब्रॅण्ड बनवून शेतमाल उत्पादन विक्री सुरु केली. सर्व मित्रमंडळी मिळून सुमारे २५० देशी गायींचा सांभाळ ते करतात. त्यांच्या गोमुत्र व शेणाचाच शेतीत वापर होतो. तिच्या शेतावर तिने मेथी, पालक यासारख्या पारंपरिक भाजीपाल्याबरोबरच यलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, लेट्युस आदी एक्झॉटिक भाजीपाला घेण्यावर भर दिला. दैनंदिन विक्री व्हावी यासाठी सेंद्रिय दुध विक्रीला सुरुवात केली. पुण्यात सकाळी लवकर दूध विक्री व्हावी यासाठी भल्या पहाटे उठून मित्रांसह सर्व नियोजन करावे लागत होते. --

शेतीच्या नादिष्टपणामुळेच अभिनेत्री बनण्याचे भाग्य मालविकाला सकाळची जिम करायचीही आवड होती. मात्र दुधविक्रीच्या नियोजनासाठी सकाळचा वेळ जात असल्याने सकाळी नियमित जिमला जाण्याच्या सवयीला तिला मुरड घालावी लागली. पण म्हणतात ना देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच! सकाळीची जिम होत नव्हती म्हणून तिने दुपारची जिम सुरु केली. याचाच तिला ‘स्टार ’चमकल्याप्रमाणे फायदा झाला. दुपारच्या जिमला येणाऱ्या पुण्यातील ‘सुर्वेज्’ या हॉटेलचे मालक माधव सुर्वे यांच्याशी तिची ओळख झाली. सुर्वे हे चित्रपट निर्माते प्रवीण तरडे यांचे मित्र. प्रवीण तरडे हेही त्यावेळी ‘मुळशी पॅटर्न’ साठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. सुर्वे यांनी मालविकाला चित्रपटात काम करणार का अशी विचारणा केली. तिने हो म्हटले खरे पण ही नुसती गंमतच आहे असे तिला वाटले. मात्र काही दिवसांनी माधव सुर्वे यांच्या सोबतीने तिने प्रवीण तरडे यांची भेट घेतली. प्रवीण तरडे यांच्याकडे त्यावेळी नायिकेची भुमिका मिळावी म्हणून पुरुषोत्तम करंडक अशा नाट्य स्पर्धा गाजविलेल्या सुमारे ६००-७०० मुली आॅडिशनसाठी आल्या होत्या. यात आपला काय निभाव लागणार अशी नकारात्मक मानसिकता ठेवूनच मालविकाने आॅडिशन दिली. आॅडिशनमध्ये तिला विशेष अभिनय निपुणता जरी दाखविता आली नाही तरी ती शेती करते, शेतकऱ्यांच्या समस्यांची चांगली जाण असल्याचे जाणवल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तिची नायिका म्हणून निवड केली. तिला स्वत: अभिनय शिकवून चांगल्यापैकी अभिनयही करवून घेतला. चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालून मोठा व्यवसाय मिळविला ; आणि काही दिवसातच तिचे नाव सर्वांच्या तोंडी आले. शेतीने तिला केवळ पैसाच नाही तर मानसिक समाधान व राज्यभर खणखणीत प्रसिद्धीही मिळवून दिली. याचे सगळेच श्रेय ती शेतीला देते.

...............

शेतकरी समस्यांविषयक चित्रपटांना प्राधान्य

मालविका गायकवाड यांचे शेती प्रेम आता वाढणारच असून यापुढेही चित्रपटातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायला आवडेल अशी भुमिका आहे. एवढेच नाही तर सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना तारणार असून सेंद्रिय शेतीमाल खाल्ल्यानेच सामान्य नागरिकांनाही सकस व विषमुक्त पोषण मिळणार आहे असे तिचे मत आहे. त्यामुळे याबाबत कोणी मदतीची हाक दिली तर तिच्या परीने मदत करण्यास तिला आवडेल असेही ती सांगते.

---

टॅग्स :PuneपुणेMulashi Pattern Marathi Movieमुळशी पॅटर्नagricultureशेतीFarmerशेतकरी