शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बेलवाडी परिसरात ‘लाळखुरकत’ने जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:12 IST

शेतकºयांमध्ये काळजीचे वातावरण लासुर्णे : बेलवाडी, जंक्शन व आनंदनगर परिसरात अशी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. इंदापूर तालुक्यात ...

शेतकºयांमध्ये काळजीचे वातावरण

लासुर्णे : बेलवाडी, जंक्शन व आनंदनगर परिसरात अशी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. इंदापूर तालुक्यात लाळ खुरकात रोगाने थैमान घातल्याचे चित्र आहे. या भागातीलही शेतकऱ्यांची अनेक जनावरे लाळ खुरखत रोगाने दगवली आहेत. यामध्ये शेळ्या आणि दुभत्या गायींचा समावेश आहे. दुसरीकडे प्रशासनाने केंद्राकडूनच लसीकरण लांबल्याचे सांगितल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कुटुंबाच्या चरितार्थाचे साधन असणारी जनावरेच दगावल्याने आता शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पशुसंवर्धन विभागाने लाळखुरकात रोगाने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. तालुक्यात पशुपालन हा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय केला जातो. परंतु या रोगाने थैमान घातल्याने या भागातील पशुपालन व्यवसाय कोलमडणार आहे. पशुसंवर्धन विभागाने यावर तालुक्यात सर्व्हे करावा, ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे.

नुकताच लसीकरण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुक्यात राबविला गेला. तालुक्यात एकूण मोठी जनावरे १ लाख ७० हजार ४६५ एवढी असून सदर जनावरांसाठी एकूण १ लाख ५८ हजार लाळखुरकत लस मात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे. लस तालुक्यांमधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. लाळखुरकूत लसीकरण दुसरी फेरी २१ दिवसांमध्ये तालुक्यात पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु या दगावलेल्या जनावरांचे काय, असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

——————————————————

...लाळ खुरकत लस कार्यक्रम हा केंद्राचा विषय

यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लाळखुरकत लस कार्यक्रम हा केंद्राचा विषय आहे. मार्च-एप्रिलमध्ये लस यायला पाहिजे होती. ती उशिरा आली. परंतु जर जनावर खात नसेल तर शेतकऱ्यांनी दिवसातून चार वेळा तरी जंतुनाशक पावडरने जनावरांचे तोंड व पाय धुवावेत. चारा न देता ‘लिक्विड’ स्वरुपात खाद्य द्यावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत,त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. परंतु सध्या निधीची कमतरता असल्याने वाढीव निधीची मागणी केली जाणार असल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

—————————————————