शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

AI च्या वापरातून केेलेल्या बारामतीच्या ऊस शेतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:18 IST

कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसलागवडीचा प्रयोग  करण्यात आला आहे.

बारामती  -बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विविध शेतीसंशोधनाचे देशात दखल घेण्यात आली आहे.आता कृषि विज्ञान केंद्राने  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करीत केेलेली उसाची लागवडीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शेतीसाठी देखील एआय तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे यानिमित्ताने सिध्द झाले आहे.   कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसलागवडीचा प्रयोग  करण्यात आला आहे. ‘कृषि विज्ञान केंद्राचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने घेतली आहे. भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केला आहे. राज्यातील १०० शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ऊस या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.सत्या नंडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती येथील  टीमला भेटून खूप आनंद झाला, जे आमच्या अेआय टूल्सचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत, असे ट्विट सत्या नाडेला यांनी केलं. त्यावर, शरद पवार यांनी धन्यवाद असा ‘रिल्पाय’ दिला आहे. शेतीसाठी ‘अेआय’ चे फायदे हायलाइट करण्यासाठी आपले आभार. बारामतीमधील शेतकऱ्यांना या तंत्रानाचा चा फायदा मिळवून देण्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अेडीटी’ आम्ही वचनबद्ध आहोत. तसेच, शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल याची खात्री देत मायक्रोसाॅफ्ट  सोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत, असेही शरद पवार यांनी नमुद केलं आहे. बारामती येथील  ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून होणारा शेतकऱ्यांचा फायदा याचा उल्लेख भारताला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी केला. त्यांचे हे कौतुकाचे शब्द सर्व भारतीयांना,'ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट', ट्रस्टचे तंत्रज्ञ, कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद आणि मोलाचे आहेत. भविष्यात आपण सर्वजण मिळून शेती, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू हा विश्वास आहे,अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ‘एडीटी’चे काैतुक  केले आहे.कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘एआय’ या तंत्रज्ञानाद्वारे केलेला  ऊसलागवडीचा प्रयोग गेमचेंंजर ठरणार आहे.त्यामुळे ऊसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल,तसेच शेतकर्यांचे जीवनमान  सुधारण्यासाठी मदत होणार आहे.राज्यात ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न ३० ते ३५ हजार कोटी आहे.तंत्रज्ञानाच्या वापराने यामध्ये  ४५ हजार कोटींची वाढ होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापुर्वीच व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सAgriculture Sectorशेती क्षेत्रsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामती