शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यातील महामार्गाची झाली दुर्दशा; अपघातात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:33 IST

गतिरोधक पूर्णपणे उखडले; अपघात होण्याची शक्यता.....

ठळक मुद्देमुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाहीपुणे-सातारा महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणीरस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्तअधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे महामार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात

नसरापूर : पुणे-सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब नसरापूर- चेलाडी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या भिंतीला बाहेरच्या बाजूने फुगवटा आल्याचे वेळेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे लक्षात आल्याने वेळीच बांधकाम कर्मचाऱ्यांनी धोकादायक बांधकाम पुन्हा काढून पुढचा अनर्थ टाळला.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पुणे-सातारा-पुणे महामार्गावरील नसरापूर येथील चेलाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम चालू आहे. या सुरू असलेल्या पुणे-सातारा बाजूच्या महामार्गावरील पुलाच्या भिंतीला सुरू कामातच काम दोरीत न झाल्याने भिंतीला बाहेरील बाजूने फुगवटा आल्याने ते वाहतुकीच्या रस्त्यावर पडू शकले असते. पुलाच्या भिंतीचे बांधकाम निकृष्ट व धोकादायक झाले होते ते स्थानिक नागरिकांनी काम करत असलेल्या कामगारांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे पुढचा धोका टळला. त्यामुळे काम करत असलेल्या कामगारांनी सुमारे तीस ते पस्तीस फूट लांब व ते पंचवीस फूट उंच बांधकाम पुन्हा उकरून काढावे लागले आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या लगत दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे ये-जा करणाºया अवजड वाहनांची मोठी संख्या असते. या वाहनांवर या भिंतीचे बांधकाम पडले असते, तर मोठा अनर्थ घडला असता असे प्रवाशांनी सांगितले. ...* महामार्ग सहापदरीकरण करणाऱ्या कंपनीने सक्षमीकरणाकडे या कामात गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे पहिल्याच पावसानंतर महामार्गावरील हा रस्ता खचून जाईल की काय, अशी भीती नागरिकांमधून व प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. 

* अद्याप पाऊस नसला, तरीदेखील मुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाही. यामुळे या महामार्गाची तज्ज्ञांकडून तपासणी करून चौकशीअंती संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

* पुणे-सातारा महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी प्रवाशांनी व तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. नसरापूर येथील चेलाडी फाट्यावरील महामार्गावरील पुलाच्या भरावाच्या भिंतीचे, रस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या पुलालगत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमिक विद्यालय आहे

..............* काटी : वडापुरी (ता. इंदापूर) ते अवसरी या रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाळकर वस्ती व जाधववस्ती येथे वळणाचा रस्ता आहे. तसेच रस्ता नव्याने झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. अपघातप्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगावर आवर घालण्यासाठी तसेच लोकवस्तीमध्ये वाहनांची गती कमी करण्यासाठी ताबडतोब गतिरोधक बसविण्याचे गरजेचे असल्यामुळे गतिरोधक बसवण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.........गतिरोधक नाही बसवला तर पंचायत समिती इंदापूर येथे आंदोलन करू असा इशारा हरिभाऊ जाधव, हर्षद जाधव, सागर जाधव, शंकर जाधव, सूरज जाधव, युवराज करगळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

.......

* गतिरोधक पूर्णपणे उखडले; अपघात होण्याची शक्यता.....वाहतुकीपुढे हे रबरी गतिरोधक टिकाव धरू शकले नाहीत. बसविल्यानंतर पाच ते सहा महिन्यांत हे गतिरोधक पूर्णपणे उखडले असून, या ठिकाणी वाहनांची पुन्हा वेगात ये-जा सुरू झाली आहे. या  दोन्ही ठिकाणी नेहमीच प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या ठकाणी डांबर वापरून पक्के गतिरोधक बसवावेत, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.  .

* आणे : आणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वर बसविलेले गतिरोधक पूर्णपणे उखडले असून, वेगात जाणाºया वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.  गेल्या वर्षी येथील सरदार पटेल हायस्कूलकडे जाणाºया रस्त्यावर (नांदूर चौक) झालेल्या अपघातात एक शालेय विद्यार्थी जखमी झाला होता. त्या वेळी संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर नांदूर चौक तसेच बसस्थानक या ठिकाणी महामार्गावर रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते. परंतु या महामार्गावर असणाºया अवजड वाहनांच्या प्रचंड .............

* पुणे-सातारा - पुणे महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी प्रवाशांनी व तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे. नसरापूर येथील चेलाडी फाट्यावरील महामार्गावरील पुलाच्या भरावाच्या भिंतीचे, रस्त्याच्या भरावाच्या कामात कामचुकारपणा असेल, तर मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या पुलालगत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमिक विद्यालय आहे.

........

* पुण्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-नगर पुणे-बंगलोर तसेच पुणे-मुंबई या सर्वच मार्गाची पुरेशा देखभाली अभावी दुर्दशा झाली आहे.अनेक ठिकाणी गती रोधक उखडले आहेत. त्यामुळे भरधाव जाणाऱ्या वाहनांचे अपघात वाढले आहेत. त्यात नाहक बळी जात आहेत.

*वडापुरी गावाच्या शेजारी असलेले भाडगाव म्हसोबा देवस्थानकडे जाणारे भाविक या रस्त्याने मोठ्या संख्येने जात असतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच जाधववस्तीच्या शेजारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेला संरक्षक भिंत नसल्यामुळे लहान मुले मधल्या सुट्टीत रस्यावर ये-जा सुरू असते. या मार्गावर कामानिमित्त येणारे तालुक्यातील नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी आदींची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. 

* या ठिकाणी किरकोळ अपघात सतत होत असतात. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी नसरापूरनजीकच्या उड्डाणपुलाची निर्मितीच चुकीची झाल्याचे अधिकाऱ्यांच्याऐवजी नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनीच पुढाकार घेऊन काम बंद पाडले व पुन्हा नव्याने उड्डाण पुलाची भिंत अधिकाऱ्यांना उभी करावी लागली. यावरूनच महामार्गाच्या निर्मिती व दुरूस्ती करणाऱ्या कंपनीचे किती लक्ष आहे ते स्पष्ट होते. 

* अधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे महामार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आणे येथे गतिरोधकांची दुर्दशा झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघात