शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

पुणे : जिल्ह्यात पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता कोरोनामुळे बंद केला आहे. मात्र, समाज कल्याण ...

पुणे : जिल्ह्यात पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता कोरोनामुळे बंद केला आहे. मात्र, समाज कल्याण विभागाने व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेत उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी पहिली ते चौथीमधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्राव्यतिरिक्त अन्य भागातील अनुसूचित जाती/जमातींच्या दारिद्रयरेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत नियमित उपस्थिती राहणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक रुपये २२० कमाल मर्यादेच्या अधीन राहून एका दिवसाला एक रुपया याप्रमाणे एकूण वर्षाच्या ७५ टक्के हजेरी असणाऱ्या मुलींना हा उपस्थिती भत्ता दिला जातो.

कोरोना काळात विद्यार्थिंनींसाठी राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ दिला जाऊ नये, असे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता बंद झाला आहे. मात्र, या योजनेमुळे प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होऊन शाळेतील मुलींच्या उपस्थितीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही योजना बंद करण्याऐवजी उपस्थिती भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.

राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कोरोनामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता यंदा दिला जाणार नाही.

- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

—-

कोरोनामुळे समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणारी एकही योजना बंद केलेली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे राबविल्या जात असलेल्या योजनेद्वारे विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिला जातो, असे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

——

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात सुमारे २६ हजार विद्यार्थीनींना लाभ दिला जातो. दोन दिवसांपूर्वीच या विद्यार्थिंनींच्या उपस्थिती भत्त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित केली आहे.

—-

राज्यातील उपस्थिती भत्ता मिळणाऱ्या विद्यार्थिंनींची आकडेवारी

वर्ष लाभार्थी विद्यार्थिनी योजनेवरील खर्च

२०१४-१५ २,४०,४४० ५,२८,९७,०००

२०१५-१६ २,५१,४४० ५,५३,०२,०००

२०१६-१७ ३,७३,२७२ ८,२१,२०,०००

२०१७-१८ १,४७,६८२ ३,२४,९१,०००

२०१९-२० १,८४, ८०४ ३,२४,९३,०००

२०२०-२१ १,८४, ८०४ ४,०६,५७,०००