शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

अत्रे यांचे सोपे-उत्स्फूर्त लिखाण आजही वाचकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 06:01 IST

साहित्यिक द. मा. मिरासदार : आचार्य अत्रेंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त साधला संवाद

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : ‘विनोदी साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आचार्य अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. अत्रे म्हणजे विनोदाचा धबधबा होते. पिढ्या बदलल्या तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही, ही नस आचार्य अत्रेंनी बरोबर ओळखली होती. त्यांचे लिखाण सहजसोपे, उत्स्फुर्त असल्याने आजही वाचकांना आपलेसे वाटते,’ या शब्दांत ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

आचार्य अत्रे यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘लोकमत’ने ब्याण्णव वर्षिय द. मा. यांच्याशी संवाद साधला. या वेळी द. मा. म्हणाले, आचार्य अत्रेंनी लेखनात कमालीचे वैविध्य जपले. त्यांनी कवितेपासून सुरुवात केली आणि नंतर विडंबनाकडे वळले. गडकरी यांच्यानंतर उत्तम नाटककार रंगभूमीला मिळाला नव्हता. अत्रेंनी रंगभूमीवरील ही उणीव भरुन काढली. एकदा बालमोहन नाटक मंडळीचे दामूअण्णा जोशी अत्रेंकडे आले. ते म्हणाले, ‘अत्रे, लोकांना नाटकामध्ये नवं काहीतरी हवं आहे. बघा प्रयत्न करु.’ अत्रे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांसाठी एक-दोन नाटकं लिहिली होती. जोशींच्या विनंतीनंतर त्यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ‘साष्टांग नमस्कार’! हे नाटक विडंबनात्मक होते. औंधचे राजे त्या वेळी या नाटकाचा प्रचार करत असत. संस्थानात त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हा उत्तम व्यायाम आहे, असे सांगत असत. त्यांची थट्टा करण्यासाठी आचार्य अत्रेंनी हे नाटक लिहिले. त्यातील रावबहादूर हे पात्र खूप गाजले.सर्वसामान्यांसाठीचा विनोद अत्रेंकडून शिकलो‘मला कॉलेजला असल्यापासून आचार्य अत्रेंचे प्रचंड आकर्षण होते. बीएचे शिक्षण घेताना प्राध्यापक वाटवे आम्हाला अत्रे यांच्या खंडाळयातील बंगल्यावर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांची खूप भाषणेही मी ऐकली. अत्रेंचे नाटक, चित्रपट, साहित्य यांवर मी स्वतंत्रपणे व्याख्याने दिली आहेत. सामान्य लोकांनाही कळेल, असा विनोद असावा, हे मी अत्रेंकडून शिकलो.’ - द. मा. मिरासदार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे