शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:11 PM

गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत

ठळक मुद्देधरणातील पाणी पातळी खालावली : जुन्या आठवणींना उजाळा, तरुणांची गर्दीअवशेषांचे चित्रीकरण करून त्याद्वारे जुन्या गावाची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल

येडगाव : येडगाव धरणबांधणीनंतर येडगाव धरणातील पाण्याने गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत. आतापर्यंत मागील काही वर्षांत अनेक वेळा पाण्याची पातळी खाली गेली होती; परंतु सध्याची परिस्थिती मात्र अत्यंत भीषण आहे. येडगाव हे धरणग्रस्त गाव असून, १९७६ मध्ये धरणबांधणीच्यावेळी गावातील शाळा, पाण्याचे आड, मंदिरे, जुने वाडे, घरे, मशीद साºया वास्तू पाण्याखाली गेल्या होत्या. येडगावातील नवीन पिढीला या गावाची माहिती सांगण्यासाठी पुढाकार घेतला. अवशेषांचे चित्रीकरण करून त्याद्वारे जुन्या गावाची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. याप्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला, त्या काळची भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती संदर्भात अनेक जुन्या आठवणी ज्येष्ठांकडून तरुणांना सांगण्यात आल्या. तसेच धरणबांधणीला करण्यात आलेला प्रचंड विरोध व त्या वेळी झालेला गदारोळदेखील सर्वांना स्मरण झाला. यावेळी येडगावचे माजी सरपंच गुलाबराव नेहरकर, देविदास भोर, गणेश गावडे, प्रकाश नेहरकर, शिवाजी शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.......येडगाव धरणात गेलेला पाण्याचा आड ४४ वर्षांनंतर अजूनही त्याच अवस्थेत आहे. आज ४४ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाण्याची पातळी खालावली असल्याने सर्व वास्तूंचे अवशेष स्पष्ट दिसत आहेत. अनेक वर्षांपूर्वीचे वड, पिंपळ या वृक्षांचे अवशेष अजूनही तग धरून आहेत. ..............

टॅग्स :Junnarजुन्नरDamधरणdroughtदुष्काळ