शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 9:08 PM

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली.

बारामती दि २१ (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडफोडीचे राजकारण सुरु आहे. भाजपच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यात आली.प्रत्येक आमदाराला ५० कोटी देऊन आमचे सरकार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक  वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून  फोडण्यात आले. हे संपूर्ण महाराष्ट्राने , देशाने उघड्या डोळ्याने हे राजकाण पाहिले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. इडी, सीबीआयची भिती दाखवायची.  लोकसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल, अशी  टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बारामतीत गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना  देशमुख यांनी पुत्र व कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना व राष्ट्रवादी फुटली या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टिकेला उत्तर देताना  ही टीका  केली.

देशमुख पुढे म्हणाले, फोडाफोडीला जनता कंटाळली असून येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपला ती उत्तर देईल, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यातील अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे  विधानसभा निवडणूक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आमदारांची  मोठ्या प्रमाणात घरवापसी झाल्याशिवाय राहणार नाही, असा देखील दावा देशमुख यांनी केला.

देशमुख पुढे म्हणाले,सध्या भाजपचे आमदार बिचारे सर्वात  दुखी आहेत. आम्हाला ते विधानसभेत भेटतात. ते म्हणतात बाहेरुन आमच्या पक्षात  आलेले लोक मंत्री होतात,आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत बसतो. बाहेरून येणारे पहिल्या पक्तींत बसले. आमचा अजुन नंबर लागत नाही.त्यांना बाजुला ठेवुन बाहेरुन आलेल्यांना मंत्रीपदे दिली जातात.त्यामुळे या सगळ्यात भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी आहेत.त्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचे  देशमुख म्हणाले.

यावेळी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांचे काैतुक केले.सुळे यांचे गेल्या १५ वर्षातील काम संबंध देशाला माहित आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून त्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. कामाच्या बाबतीत सतर्क असणाऱया खासदार म्हणून त्या अोळखल्या जातात. बारामती मतदारसंघातील जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख