शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

अख्खं आयुष्य सरलं; पण डोईवरचा हंडा उतरलाच न्हाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 1:28 PM

सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास...

ठळक मुद्देआदिवासी भगिनींच्या व्यथा : गावात मुली देण्यासही तयार नाही

संतोष जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : ‘‘अख्खं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय! सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा किव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या गावाली द्यायचं म्हटलं तर पोरीचा बा म्हणतो ‘नको गड्या पक्की पाण्याची टिपावं (दुष्काळ) हाय, तुमच्या मुलकाली त्या गावाली माया पोरीचा आख्खं आयुष्यभर पाणी भरता भरता जायचं’, आमच्या गावाली पोरी द्यायला कोणी धजत नाही,’’ हे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये  राहणाऱ्या आदिवासी महिला रखमाबाई वाजे यांचे.

आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाच्या खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवा-सुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. सुमारे शंभर घरांचा उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे-पाचशेच्या आसपास. भीमाशंकर अभयारण्यात वसलेल्या या गावाला एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो.  या पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगर दऱ्याखोऱ्यातून खडतर पायपीट करावी लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले आहे. जवळच असलेल्या शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी, केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यासाठी एक कूपनलिका ती ही आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पुन्हा अडीचशे ते तीनशे फूट खाली खोल दरीत उतरून पुन्हा तेवढेच वर चढून चोंडीच्या झऱ्याच्या धबधब्यावरून हंडा वर काढताना यातना सहन कराव्या लागत आहेत.

एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण, आम्ही जीवन जगायचे तरी कसे, या वयाला वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे लोटली? आम्ही पारतंत्र्यातच आहोत.

- साळीबाई दाते, ग्रामस्थ   

टॅग्स :ambegaonआंबेगावWaterपाणीdroughtदुष्काळ