शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

आळंदीत इंद्रायणीला जलपर्णीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:16 AM

आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे.

आळंदी : येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. जलपर्णीच्या आच्छादनामुळे जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. ही जलपर्णी काढून कायमस्वरूपी उपायजोना करण्याची मागणी होत आहे.नदीतील पाण्याला हिरवट रंग आणि दुर्गंधीयुक्त वासाने नदीचे पाणी आता वापरास अयोग्य झाले आहे. इंद्रायणी नदीत प्रचंड जलपर्णी फोफावली असून, ती आता फुलावर आली आहे. दिवसेंदिवस तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंद्रायणीला लागलेले जलपर्णीचे हे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न येथे येणारे भाविक विचारत आहेत.या संदर्भात आळंदी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सागर भोसले म्हणाले, की नदीतील जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. तसेच, आता नदीत पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळीदेखील वाढेल. पाण्याचा प्रवाह वाहता राहणार असल्याने रंग आणि वास असलेले पाणी पुढे प्रवाहात वाहून जाईल. यामुळे आळंदीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटणार आहे. येत्या ४ दिवसांत आळंदीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे भोसले यांनी सांगितले.पाणीपुरवठा केंद्राच्या पाणी साठवण बंधाऱ्यात जलपर्णी राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नदीपात्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जलपर्णी वाहत येऊन आळंदी पाणीपुरवठा केंद्राच्या बंधाºयात येऊ नये, यासाठी प्लॅस्टिक ड्रम वायर रोपच्या साह्याने जलपर्णी थोपविण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावर ताण येणार नाही, असे भोसले यांनी सांगितले. यासाठी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचे मार्गदर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणAlandiआळंदीindrayaniइंद्रायणी