शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माळेगाव, भीमाशंकरच्या बरोबरीत घोडगंगा ऊस दर देणार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 11:25 IST

जाती, पाती, नाती, गोत्यांचा विचार करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले...

रांजणगाव सांडस (पुणे) : चुकीच्या लोकांच्या हाती कारखाना दिल्यामुळे थेऊर कारखाना, भीमा पाटस कारखान्याची दयनीय अवस्था झालेली आहे. पुढील पाच वर्षांत घोडगंगा सहकारी साखर कारखाना माळेगाव, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत दर देईल. कोणाला तिकीट मिळाले नसेल तर त्यांनी नाराज होऊ नये. जाती , पाती, नाती, गोत्यांचा विचार करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

मांडवगण फराटा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शेतकरी विकास पॅनलने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी, कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, ज्येष्ठ माजी संचालक झुंबर रणदिवे, सुजाता पवार, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, मानसिंग पाचुंदकर, तालुका अध्यक्ष रवी काळे, संतोष रणदिवे, माजी दूध संघ संचालक जीवन तांबे, राहुल करपे-पाटील आदी उपस्थित होते.

अशोक पवार म्हणाले, दिवंगत माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या विचाराने या भागात चासकमान कालवा, घोड कालवा यामुळे या भागात पाणी आले. या भागातील शेतकरी ऊसशेती करू लागला. जिल्ह्याबाहेरील कारखाने या भागातील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात होते; परंतु उसाला योग्य बाजार भाव मिळत नव्हता. म्हणून दिवंगत माजी आमदार रावसाहेब दादा पवार व त्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नाने न्हावरे येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना होऊन १९९७ साखर पोते बाहेर पडले. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळू लागले. राज्य सरकारने ६.३८ पैसे वीज खरेदी करार केला होता; परंतु प्रत्यक्षात ३ रुपये प्रति युनिट वीज खरेदी केल्यामुळे कारखान्याला आर्थिक तोटा सहन करावा लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, चासकमान, डिंबा, कुकडी, घोड नदीचे पाणी कॅनॉलद्वारे परिसरात आल्याने या भागात शेतकरी सुखी व संपन्न झाला. भाजप सरकारने साखर निर्यात बंदी घातली. त्यामुळे साखरेचे भाव खाली पडले.

फोटो

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवारBhimashankarभीमाशंकरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील