शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:38 IST

आमच्या सोबत प्रचंड बहुमत असल्याने जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात त्यातून शांतपणे मार्ग काढले जातात

पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाला आहे. राज्य सरकारने मागण्या पूर्ण करत यांच्यासहित महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा दिला आहे. आरक्षण मागण्या पूर्ण झाल्यावर आता विरोधक शांत का बसले आहेत? असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाण साधला आहे.   

अजित पवार म्हणाले, आमच्या सोबत प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे सरकारला जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात ते शांतपणे सामोपचाऱ्यांनी कसा काढता येईल प्रयत्न केला जातो. मुंबई मध्ये मराठा आरक्षण झालेल्या आंदोलनामध्ये काही जण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. कमी संख्या आहे त्यामुळे आपले काही होईल का बघत होते. आता दिले तर आता गप्प गार झाले आहेत. मिडिया मध्ये जाऊन बोलत होते आता दिले तरी चर्चा सुरू आहे. 

पुढच्या वर्षी लवकर या 

पुण्याच्या भूमीतून छत्रपती शिवाजी सारखा राजा आपल्याला मिळाला. अनेकजण अनेकांना घडवण्याचे काम करत असतात. शिक्षकदिन उद्या आहे माहिती आहे एक दिवस आधी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतोय. राज्यात देशात आणि जगात गणेशोत्सवाच आनंदाने सुरू आहे. जातीय सलोखा ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा काम करत असते, मंगलमय वातावरण आहे. गणपती विसर्जन बघता बघता आले, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणावे लागेल.

गावाचा विकास झाला तर देशाचा होईल 

 पंचायतराज अभियान सुरू झाले आहे. या कार्यशाळा मध्ये अनेकजण सहभागी आहेत ते त्याचे अनुभव सांगतील. आम्ही गेलो तरी कोणी सोडवून जाऊ नका, मी आपला जातो, कोणी सोडवायला येऊ नका. या अभियानाचा उद्देश आहे की, गावागावात विकास करणे. यावेळी मला आर आर पाटील याची आठवण येते. त्यांनी अनेक अभियान राबवले. आर आर पाटील यांनी काम केले त्याचे कौतुक झाले. अनेक गाव स्वच्छ झाली. विकास झाला, यात सातत्ये टिकले पाहिजे. प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे स्वावलंबी झालं पाहिजे. आदर्श ग्राम राज्य झालं पाहिजे. गावाचं स्वतःचं अन्नधान्य रोजगार स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत स्वावलंबन प्राप्त केलं पाहिजे. हा त्या काळामध्ये महात्मा गांधींनी सांगितलेला विचार आहे. आज त्या गोष्टी आपल्याला किती बारकाईने लक्षात येतात. खेडी सक्षम झाली तर आपला भारत देश आपोआप सक्षम होईल. म्हणूनच त्यांनी ग्रामसभा लोकसहभाग, कुटीर उद्योग महिला सक्षमीकरण आणि सर्वांसाठी न्याय या मूल्यावर आधारलेला ग्रामविकासाचा विचार त्या काळामध्ये मांडला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचं काम केलं. सत्तेचा विकेंद्रीकरण करण्याचं काम केलं. ग्रामपंचायत ही केवळ व शासकीय यंत्रणा नाही. तर ती लोकशाहीची शाळा आहे. अनेक नेते जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून पुढे आले आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर पहिला १०० दिवसाचा कार्यक्रम आणला. आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आणला. संजय गांधी निराधार योजना सुरुवात ६० रुपयाने सुरू झाली. कामाचा दर्जा चांगला ठेवा. २५ कोटी झाडे लावण्याचा आमचा मानस आहे. जनतेला सरकारी योजना लाभ मिळाला पाहिजे असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण