शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या जीवरक्षकांमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: April 18, 2017 02:36 IST

आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे

रावेत : आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे. परिसरात एकच तलाव असल्यामुळे येथे पोचण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तलावाच्या नियमाप्रमाणे हद्दीतील नागरिकांनाच पोहण्यासाठी परवानगी आहे; परंतु पालिका हद्दीबाहेरील नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना पोहण्यास अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे ६ ते ९.४५ व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत खुला असतो. या वेळेत दररोज किमान ६०० ते ७०० जण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात. सध्या येथे ना क्रीडा शिक्षक ना पुरेसे प्रशिक्षक अशी स्थिती पहावयास मिळत आहे. नियमाप्रमाणे पोहणाऱ्यांची आणि प्रशिक्षकांची १:२५ या प्रमाणात विभागणी करण्यात येत असते. म्हणजेच एका वेळेस केवळ 50 व्यक्तींना प्रवेश देणे अपेक्षित असताना येथे मात्र एकावेळी १०० व्यक्तींना त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवेश दिला जातो. नकळत जर एखादी दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तलावाची क्षमता पाहता व दिवसेंदिवस पोहणाऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता आणखी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मोठ्या तलावालगत १२ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला बेबी तलाव गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे लहान मुलांना इतरांसोबत पोहण्याची अडचण निर्माण होत आहे. याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की बेबी तलाव लिकेज असल्यामुळे बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीशेजारी असणारे चेंबर उघड्या अवस्थेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जीवरक्षकांच्या विश्रांतीसाठी असणारी खोली आणि तलावासाठी पाणीपुरवठा व फिल्टरेशन याकरिता एकच खोली आहे. त्या खोलीची भिंत पाडून पाइप सोडण्यात आले आहेत. तलावात उतरण्यासाठी असणाऱ्या शिड्या निखळण्याच्या स्थितीत आहे.शहरातील इतर तलावाच्या मानाने तिकिटाचे दर कमी असल्यामुळे देहू, देहूरोड, चिंचवड, प्राधिकरण, आकुर्डी, वाल्हेकरवाडी,रावेत आदी परिसरातून पोहण्यासाठी नागरिक येत असतात. प्रत्येक व्यक्तीस ३० मिनिटांकरिता १० रु आकारणी केली जाते. जी इतर तलावाच्या मानाने खूपच कमी आहे. तलावामध्ये बसविण्यात आलेल्या फरशा तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोहताना पायास जखम होते. तसेच ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याच्या गटाराच्या बाजूने अनेक ठिकाणी कठडे तुटल्यामुळे पोहणाऱ्याच्या हाताला इजा होतात. जीवरक्षकासाठी असणाऱ्या खोलीमध्ये इतर साहित्याची ठेवण केल्यामुळे जीवरक्षकांना उघड्यावरच विश्रांती घ्यावी लागते. सकाळी ९ ते ९.४५ व दुपारी २.३० ते ३.१५ ही वेळ केवळ महिलांसाठी राखीव आहे. या वेळेत अनेक महिला पोहण्यासाठी येतात; परंतु महिलांसाठी महिला जीवरक्षकाची नियुक्ती नसल्यामुळे पुरुष जीवरक्षक महिलांच्या वेळेत उपस्थित असतात. त्यामुळे महिलांना पोहताना संकोचित होते, असे महिलांचे म्हणणे आहे.महिलांसाठी स्वतंत्र महिला जीवरक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या महिलांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे करूनसुद्धा प्रशासन महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)दररोज विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोफत सोडण्याकरिता येथील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे सुद्धा मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट होत आहे. जे नागरिक तिकिटासाठी तासन्तास उन्हामध्ये उभे राहून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना मात्र अशा फुकट्यांमुळे तिकीट मिळत नाही. पालिकेने सुरक्षारक्षक नेमावेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक हे ठेकेदारांचे असल्यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अर्थकारण करीत गुपचूप नागरिकांना आत सोडले जाते. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते : तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी नागरिक भर उन्हात अनेकवेळा ताटकळत उभे असतात. त्यांच्यासाठी तिकीट विक्रीसमोर सावली करून देणे गरजेचे आहे.