शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:46 IST

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल

इंदापूर : शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. कष्टाळू,दयाळू व मायाळू असणा-या शेतकऱ्याला जर झिटकारले तर शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये, असा सज्जड इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी (दि.१८) वरकुटे बुद्रुक येथे बोलताना दिला.

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते तेथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गाईच्या दुधाला ७५ रुपये तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ती मान्य झाल्यास महागाई निश्चितपणे कमी होईल. रयत क्रांती संघटनेने दि. २२ मे रोजी काढलेल्या यात्रेमध्ये दूध दरवाढीचा विषय आम्ही लावून धरला होता. त्याच्या अनुषंगाने दुधाच्या प्रश्नावर २२ जून रोजी पुण्यात दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत १ हजार मिली दुधाला एका दारुच्या बाटलीचा भाव द्या, एवढीच साधी मागणी आपण करणार आहोत,असे ते म्हणाले.    यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची बिले तात्काळ द्यावीत. शेती तुकडेबंदी कायदा रद्द करावी. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांच्या पशुधनास १ रुपयात विमा लागू करावा या व इतर मागण्यांसदर्भात सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले.   भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर आंदोलनाचा इशारा

इंदापूरमधील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे देणे गरजेचे असताना ते दिले नाहीत. त्यामुळे गावगाड्यातील शेतकऱ्याला व त्याच्या पोरांना जागे करून दि.३० जून पर्यंत पैसे न दिल्यास दि. १ जुलै रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा खोत यांनी दिला आहे.

'विच्छा माझी पूर्ण करा' चा पार्ट टू म्हणजे संजय राऊत 

जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू, त्यानंतर स्वतःच भगवा फडकवू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दादा कोंडकेंचे वगनाट्य होते ' विच्छा माझी पुरी करा' त्या वगनाट्याचा पार्ट टू म्हणजे  संजय राऊत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीGovernmentसरकार