शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाला पडले भगदाड; धोकादायक पद्धतीने अजूनही वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:33 IST

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता

भिगवण : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ (ता. इंदापूर) येथील पुलाला भगदाड पडले असून पुलाच्या लगतचा काही भाग कोसळला आहे यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी देखील पुलावरून बंद असलेली अवजड धोकादायक वाहतूक सुरूच आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने पाण्याच्या लाटा पुलांच्या भिंतींना धडकत असल्याने पुलाचा भाग निखळून पडत असल्याने  पुलाला धोका निर्माण झाला आहे.

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता. कालांतराने नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ब्रिटिशांनी डिकसळ येथे भीमा नदीवर पूल उभारलेला आजही नागरिकांना दळणवळणासाठी वरदान ठरत आहे. परंतु सध्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी देखील या पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून पूल कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड शुगर , इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता.  म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी  करून पुन्हा चालू केला होता.  आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.

दोन जिल्हाच्या संर्पक तुटणार?

पुणे आणि सोलापूर जिल्हातील ३० ते ३५ गावांसाठी वरदान असलेला हा पूल दळणवळणासाठी महत्वाचा आहे. हा पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार असून दळणवळ करण्यासाठी ५० किलोमीटरचा वळसा घालून गावांकडे जावे लागणार आहे. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, खातगाव, जिंती, पारेवाडी केतूर, कात्रज, पोमलवाडी, रामवाडी या गावांमधील नागरिक विद्यार्थी दररोज शैक्षणिक तसेच अन्य कामांसाठी भिगवणला ये-जा करत असतात. या पुलाचा संर्पक तुटल्यास मोठे नुकसान होणार आहे.

पुलाचे काम रखडले

करमाळा तालुक्याचे तत्कालीन आमदार संजय शिंदे यांनी विधानसभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५५ कोटींचा निधी मंजूर केला होता. निधी कमी पडत असल्याने वाढीव निधी देवून पुलाचे काम २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. उजनीच्या पाणी पातळीत पाण्याची वाढ झाल्याने पुलाच्या कामास अडथळा येत असल्याने काम पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर २०२५ मध्ये सुरु करण्यात मात्र काम संथगतीने सुरू होते. पाणी वाढल्याने पुन्हा बंद झाले पुलाचे काम आधुनिक पद्धतीने करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकारPoliticsराजकारण