शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाला पडले भगदाड; धोकादायक पद्धतीने अजूनही वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:33 IST

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता

भिगवण : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ (ता. इंदापूर) येथील पुलाला भगदाड पडले असून पुलाच्या लगतचा काही भाग कोसळला आहे यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी देखील पुलावरून बंद असलेली अवजड धोकादायक वाहतूक सुरूच आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने पाण्याच्या लाटा पुलांच्या भिंतींना धडकत असल्याने पुलाचा भाग निखळून पडत असल्याने  पुलाला धोका निर्माण झाला आहे.

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता. कालांतराने नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ब्रिटिशांनी डिकसळ येथे भीमा नदीवर पूल उभारलेला आजही नागरिकांना दळणवळणासाठी वरदान ठरत आहे. परंतु सध्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी देखील या पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून पूल कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड शुगर , इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता.  म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी  करून पुन्हा चालू केला होता.  आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.

दोन जिल्हाच्या संर्पक तुटणार?

पुणे आणि सोलापूर जिल्हातील ३० ते ३५ गावांसाठी वरदान असलेला हा पूल दळणवळणासाठी महत्वाचा आहे. हा पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार असून दळणवळ करण्यासाठी ५० किलोमीटरचा वळसा घालून गावांकडे जावे लागणार आहे. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, खातगाव, जिंती, पारेवाडी केतूर, कात्रज, पोमलवाडी, रामवाडी या गावांमधील नागरिक विद्यार्थी दररोज शैक्षणिक तसेच अन्य कामांसाठी भिगवणला ये-जा करत असतात. या पुलाचा संर्पक तुटल्यास मोठे नुकसान होणार आहे.

पुलाचे काम रखडले

करमाळा तालुक्याचे तत्कालीन आमदार संजय शिंदे यांनी विधानसभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५५ कोटींचा निधी मंजूर केला होता. निधी कमी पडत असल्याने वाढीव निधी देवून पुलाचे काम २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. उजनीच्या पाणी पातळीत पाण्याची वाढ झाल्याने पुलाच्या कामास अडथळा येत असल्याने काम पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर २०२५ मध्ये सुरु करण्यात मात्र काम संथगतीने सुरू होते. पाणी वाढल्याने पुन्हा बंद झाले पुलाचे काम आधुनिक पद्धतीने करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकारPoliticsराजकारण