शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाला पडले भगदाड; धोकादायक पद्धतीने अजूनही वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:33 IST

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता

भिगवण : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ (ता. इंदापूर) येथील पुलाला भगदाड पडले असून पुलाच्या लगतचा काही भाग कोसळला आहे यामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे तरी देखील पुलावरून बंद असलेली अवजड धोकादायक वाहतूक सुरूच आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली असल्याने पाण्याच्या लाटा पुलांच्या भिंतींना धडकत असल्याने पुलाचा भाग निखळून पडत असल्याने  पुलाला धोका निर्माण झाला आहे.

डिकसळ येथे ब्रिटिशकाळामध्ये जुन्या रेल्वे मार्गावर वाहतुकीसाठी रेल्वे पूल १८५५ साली उभारण्यात आला होता. कालांतराने नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर हा मार्ग रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ब्रिटिशांनी डिकसळ येथे भीमा नदीवर पूल उभारलेला आजही नागरिकांना दळणवळणासाठी वरदान ठरत आहे. परंतु सध्या या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी देखील या पुलावरून अवजड वाहतूक सुरु असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून पूल कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती ऍग्रो, अंबालिका, दौंड शुगर , इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. या पुलावरून जड वाहतूक होत असल्याने हा पूल मागे काही वर्षांपूर्वीही जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागातील जड वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता.  म्हणून काही राजकीय मंडळींनी यात मध्यस्थी  करून पुन्हा चालू केला होता.  आता तो पुन्हा बंद करण्यात आला आहे.

दोन जिल्हाच्या संर्पक तुटणार?

पुणे आणि सोलापूर जिल्हातील ३० ते ३५ गावांसाठी वरदान असलेला हा पूल दळणवळणासाठी महत्वाचा आहे. हा पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार असून दळणवळ करण्यासाठी ५० किलोमीटरचा वळसा घालून गावांकडे जावे लागणार आहे. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, खातगाव, जिंती, पारेवाडी केतूर, कात्रज, पोमलवाडी, रामवाडी या गावांमधील नागरिक विद्यार्थी दररोज शैक्षणिक तसेच अन्य कामांसाठी भिगवणला ये-जा करत असतात. या पुलाचा संर्पक तुटल्यास मोठे नुकसान होणार आहे.

पुलाचे काम रखडले

करमाळा तालुक्याचे तत्कालीन आमदार संजय शिंदे यांनी विधानसभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून ५५ कोटींचा निधी मंजूर केला होता. निधी कमी पडत असल्याने वाढीव निधी देवून पुलाचे काम २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. उजनीच्या पाणी पातळीत पाण्याची वाढ झाल्याने पुलाच्या कामास अडथळा येत असल्याने काम पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर २०२५ मध्ये सुरु करण्यात मात्र काम संथगतीने सुरू होते. पाणी वाढल्याने पुन्हा बंद झाले पुलाचे काम आधुनिक पद्धतीने करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकbikeबाईकcarकारPoliticsराजकारण