शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:33 IST

तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात

कात्रज : दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याने हा मोठा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळी तलावाच्या किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या माणसांना हे दृष्ट दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची तलावाजवळ गर्दी झाली. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते.

त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन मासे कशामुळे मृत्यू झाला त्याबाबत चौकशी करण्याचे केवळ आश्वासन दिले. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.

प्रदुषणामुळ जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात

शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांबुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.

माशांना भूल देण्याचे प्रकार सर्रास

पाटबंधारे विभागाशी संपर्क केला ते म्हणाले की, गेल्या वर्षी देखील असा प्रकार घडला होता. येथील मच्छीमार मासे पकडण्याआधी माशांना भुल देण्यासाठी काही औषदी पावडर पाण्यात टाकतात त्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळेही असा प्रकार घडू शकतो. याशिवाय मनपा प्रशासनाकडून मैला मिश्रीत पाणी या तलावात सोडले जात असल्याने प्रदुषण वाढले आहे. त्याचाही फटका माशांना व जलचर प्राण्यांना बसतो आहे.

मासे कोणत्या कारणाने मृत पावले हे पहावे लागेल

जांभूळवाडी तलावामध्ये मासे मृत होण्याची माहिती मिळाली आहे. मागेही अशाच प्रकारचे प्रकार घडला होता. ह्या झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येईल. नेमके मासे कोणत्या कारणाने मृत पावले आहेत हे पहावे लागेल. विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग.

तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले

माझ्या घरातील गॅलरीतून हा तलाव दिसतो आज सकाळी गॅलरीत आल्यावर तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले. नेमके काय झाले ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काठावर हजारो मासे मरुन पडलेले होते तर काठावर काही मासे पाण्यातून बाहेर काढावे तशी तडफड करत होते. मरून पडलेल्या प्रत्येक माशाचे तोंड उघडलेले होते. हल्ली तलावामध्ये प्रचंड प्रदुषण वाढले आहे. तलावाकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आज जलचर प्राण्यांच्या जिवावर बेतले. - आश्विनी चौरे, रहिवाशी, विघ्नहर्ता सोसायटी

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणी