शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:33 IST

तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात

कात्रज : दक्षिण पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याने हा मोठा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण स्पष्ट झाले नाही.

सकाळी तलावाच्या किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या माणसांना हे दृष्ट दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची तलावाजवळ गर्दी झाली. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते.

त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन मासे कशामुळे मृत्यू झाला त्याबाबत चौकशी करण्याचे केवळ आश्वासन दिले. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.

प्रदुषणामुळ जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात

शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांबुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.

माशांना भूल देण्याचे प्रकार सर्रास

पाटबंधारे विभागाशी संपर्क केला ते म्हणाले की, गेल्या वर्षी देखील असा प्रकार घडला होता. येथील मच्छीमार मासे पकडण्याआधी माशांना भुल देण्यासाठी काही औषदी पावडर पाण्यात टाकतात त्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळेही असा प्रकार घडू शकतो. याशिवाय मनपा प्रशासनाकडून मैला मिश्रीत पाणी या तलावात सोडले जात असल्याने प्रदुषण वाढले आहे. त्याचाही फटका माशांना व जलचर प्राण्यांना बसतो आहे.

मासे कोणत्या कारणाने मृत पावले हे पहावे लागेल

जांभूळवाडी तलावामध्ये मासे मृत होण्याची माहिती मिळाली आहे. मागेही अशाच प्रकारचे प्रकार घडला होता. ह्या झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येईल. नेमके मासे कोणत्या कारणाने मृत पावले आहेत हे पहावे लागेल. विजय पाटील, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग.

तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले

माझ्या घरातील गॅलरीतून हा तलाव दिसतो आज सकाळी गॅलरीत आल्यावर तळ्याच्या काठावर हजारो मासे मरून पडल्याचे दृष्य दिसले. नेमके काय झाले ते पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काठावर हजारो मासे मरुन पडलेले होते तर काठावर काही मासे पाण्यातून बाहेर काढावे तशी तडफड करत होते. मरून पडलेल्या प्रत्येक माशाचे तोंड उघडलेले होते. हल्ली तलावामध्ये प्रचंड प्रदुषण वाढले आहे. तलावाकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आज जलचर प्राण्यांच्या जिवावर बेतले. - आश्विनी चौरे, रहिवाशी, विघ्नहर्ता सोसायटी

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणी