शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Shaniwar Wada: देशातील वक्त्यांच्या भाषणांनी दणाणून जाणारी ऐतिहासिक वास्तू; असा हा निवडणुकीतील शनिवारवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 14:58 IST

काँग्रेस, जनसंघ, हिंदू महासभा, कम्युनिस्ट, संयुक्त समाजवादी, प्रजा समाजवादी अशा अनेक पक्षांचे नेते शनिवारवाड्यावर सभांसाठी येत होते

राजू इनामदार 

पुणे: एकेकाळी दिल्लीला धाक दाखवणारा शनिवारवाडा पुण्यात आहे ही पुणेकरांसाठी स्वाभिमान, अस्मिता वगैरेची गोष्ट आहेच; पण त्याहीपेक्षा ती जिव्हाळ्याची, आपुलकीची, प्रेमाची गोष्ट आहे. याचे कारण शनिवारवाड्याबरोबरच समोरचे विस्तीर्ण पटांगण. मागे वाड्याचा भव्य असा दिल्ली दरवाजा. त्याकडे पाठ करून वक्ता उभा आणि त्याच्यासमोरच्या पटांगणात बसलेले पुणेकर श्रोते. त्यांची दाद मिळावी म्हणून वक्ता अगदी आतुरतेने वाट पाहत असे. साहित्यिक, सांस्कृतिक असे सर्व प्रकारचे वाद या जागेत खेळले गेलेच; पण खरी बहार येत असे ती निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये. देशातील, राज्यातील वक्त्यांच्या भाषणांनी मैदान दणाणून जात असे.

शब्दांची दिवाळी

पेशवाईत घोड्यांच्या टापा घुमलेल्या याच पटांगणात निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये अगदी काल-परवापर्यंत शब्दांच्या तोफा उडत असत. उखळी बार होत तेही शब्दांचेच. आतषबाजी होई तीही शब्दांचीच. शब्दच बंदुकीच्या गोळ्या होऊन समोर येत. ते राज्यात, देशात गाजत. या पटांगणात बोलण्याची संधी मिळावी, ही देशातील प्रत्येक वक्त्याची मनोमन इच्छा असे. निवडणुकीत ही संधी सहज मिळायची. प्रमुख वक्ता येण्याच्या आधी काहीजणांवर फड गाजवायची जबाबदारी असायची. त्यांच्या दृष्टीने ती दिवाळीच असे. पुण्यातील वक्ते व श्रोते यांची जुगलबंदी तर या मैदानात नित्यनियमाने होत असे.

पु.लं.चे प्रत्युत्तर

आणीबाणीनंतरची पु. ल. देशपांडे यांची एक सभा अशीच गाजली. त्या सभेच्या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण देशपांडे यांना उद्देशून म्हणाले होते, ‘यांना ॲग्रीकल्चरमधले काय कळते?’ त्याला शनिवारवाड्यावरील सभेमध्ये उत्तर देताना पुलं म्हणाले, “आम्हाला ॲग्रीकल्चरमधले नसेल कळत; पण कल्चरमधील नक्कीच कळते.” पुलं यांचा हा टोला चव्हाण यांच्या चांगलाच वर्मी लागला होता. आणीबाणीनंतर जनता पक्षाची विजय सभा शनिवारवाड्यावरच झाली होती. त्या सभेत पुलं बोलणार होते, ‘मात्र राजकारण हा माझा प्रांत नाही’ असे स्पष्ट करत पुलंनी त्यांच्या भाषणाची व यानंतर राजकीय भाषणे नाही असा निर्धार व्यक्त करणारी ध्वनिफित पाठवली होती. तीच या सभेत श्रोत्यांना ऐकवण्यात आली.

असे होते वक्ते आणि राजकीय पक्ष

यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेकांच्या वक्तृत्वाने हे मैदान गाजले. देशभरातून अनेक लोक येत. त्यांच्यासाठी शनिवारवाड्यावरची सभा म्हणजे कसोटीच असायची. पुणेकर श्रोते महामिश्किल. एखाद्याचे बोलणे नाही आवडले तर मधूनच टाळ्या वाजवत. एखाद्याचे आवडले तर भले शाब्बास म्हणून एखादी तरी आरोळी श्रोत्यांमधून यायचीच. काँग्रेस, जनसंघ, हिंदू महासभा, कम्युनिस्ट, संयुक्त समाजवादी, प्रजा समाजवादी अशा अनेक पक्षांचे नेते सभांसाठी येत, त्यांच्या भाषणांसाठी गर्दी व्हायची.

एक हृद्यद्रावक घटना

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुण्यात झाली. केशवराव जेधे समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे यांची एक सभा शनिवारवाड्यावर झाली. अत्रे भाषण करत होते, त्याच वेळी मागे अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या जेधे यांना हृदयविकाराचा धक्का बसला. खुर्चीवरून ते कोसळले. त्यातच त्यांचे निधन झाले. शनिवारवाड्याच्या पटांगणातील ही एक हृद्यद्रावक घटना. जेधे त्यावेळी मोठे नेते होते. काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त झाली.

सभेची तयारी

पूर्वी सभांची तयारी म्हणजे दिल्ली दरवाजासमोर एक लहानसे व्यासपीठ तयार व्हायचे. चारही बाजूंना चार खांब, त्याला रंगीत कापड गुंडाळलेले, वर असले तर छत नाही तर तेही नाही. आतासारखी भव्यदिव्य व्यासपीठे नसायची. सगळीकडे कर्णे लावलेले. स्टेजवर मोजक्याच दोन-तीन खुर्च्या. एकीत अध्यक्ष, दुसरीत वक्ता व तिसऱ्या खुर्चीवर असलाच तर उमेदवार. समोर श्रोते पोती, सतरंजी वगैरेंवर बसलेले. कोणी फारच ज्येष्ठ व वृद्ध पुढारी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी काही खुर्च्या असायच्या. त्या बळकावण्याचे धाडस कोणीही करत नसे. इतक्या कमी भांडवलावर सभा सुरू व्हायची. सभेची वेळ असायची रात्री ९ नंतर वगैरे. कारण त्यावेळी वेळेची मर्यादा नव्हतीच. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सभा चालायची. 

वक्त्यांची वैशिष्ट्ये

अत्रेंसारखे नावाजलेले वक्ते असले तर पुण्यातील भेटीगाठींमध्येच त्यांचा बराचसा वेळ जायचा. त्या झाल्यानंतर रात्री उशिरा ते सभास्थानी येत. त्यांचे भाषण म्हणजे हशा व टाळ्यांची बरसातच. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रखर हिंदुत्व. इतिहासाचे दाखले देत शब्दांच्या अशा काही लडी ते उलगडत की, श्रोते भारावून जायचे. त्याउलट यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी ही नेतेमंडळी. अतिशय शांत; पण ठाशीव स्वरात ते त्यांचे म्हणणे समजावून देत असत. वर्ष २०१७ पासून शनिवारवाड्याचे पटांगण जाहीर सभांसाठी देणे महापालिकेने बंद केले. त्याची एक वेगळीच कथा आहे; मात्र आता है मैदान सभेसाठी दिले जात नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना दुसऱ्या मैदानांचा शोध घेणे भाग पडले. आता हे पटांगण शांत असते. झालेच तर तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात; पण तेही आता कमी झाले आहे. बाजीरावांचा दिल्लीकडे भाला रोखलेला पुतळा त्यामुळे एकटाच दिसतो.

टॅग्स :PuneपुणेShaniwar Wadaशनिवारवाडाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणhistoryइतिहासvidhan sabhaविधानसभा