शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

शासनाने थकविला आयआयईचा ८ कोटींचा निधी : डॉ. भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:11 IST

शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आयआयई ही संस्था कार्यरत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकितसंस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद

पुणे : शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट आॅफ एज्युकेशन (आयआयई) संस्थेला गेल्या ८ वर्षांपासून राज्यशासनाने तसेच आयसर संस्थेकडून एक वर्षांपासून निधी मिळालेला नाही. राज्य सरकारकडे ६ कोटी ९० लाख तर आयसरकडे १ कोटी २० अशी एकूण ८ कोटी १० लाख रूपयांची रक्कम थकित आहे. त्यामुळे संस्था अडचणीत आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिली.शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक व डॉ. चित्रा नाईक यांनी आयआयईची स्थापना करून त्याचे नेतृत्व केले. सामाजिक विज्ञान शाखांमध्ये आंतरशाखीय संशोधन करणारी आयआयई ही महत्त्वाची संस्था आहे. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर ही संस्था कार्यरत आहे. मात्र राज्य शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे आयआयई संस्था अडचणीत सापडली आहे. मुणगेकर म्हणाले, आयसर संस्थेकडून ४५ टक्के व राज्य शासनाकडून ४५ टक्के असे ९० टक्के अनुदान दरवर्षी संस्थेला मिळत असे. उर्वरित १० टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. राज्य शासनाकडून गेल्या ८ वर्षांपासून अनुदानच मिळालेले नाही, त्यांच्याकडे ६ कोटी ९० लाख रूपयांची रक्कम थकली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या विश्वस्त मंडळाबाबत तक्रार करण्यात आल्याने आयसर संस्थेने अनुदान बंद केले. दोन्ही अनुदान बंद झाल्याने संस्था अडचणीत आली आहे. सध्या कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ अधिकृत असल्याचा निर्णय धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे आयसर व राज्य शासनाकडून अनुदान मिळण्यास आता कोणतीही अडचण नाही.  आयआयईच्या १० पैकी ५ विश्वस्तांनी मागील वर्षी अचानक राजीनामे दिले. त्यामुळे संस्थेच्या विश्वस्त मंडळामध्ये केवळ ५ सदस्य उरले. संस्थेच्या घटनेनुसार कारभार पाहण्यासाठी किमान ७ विश्वस्तांचे मंडळ अस्तित्त्वात असणे बंधनकारक होते. त्यानंतर ५ विश्वस्तांनी मिळून नवीन ५ विश्वस्तांची नियुक्ती केली. त्याला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेचे काम पूर्वपदावर येत आहे असे मुणगेकर यांनी सांगितले. संस्थेच्या विश्वस्त तसेच पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कारभारात सुधारणा करायची असते. मात्र, त्यांनीच संस्थेचा कारभार योग्य नसल्याचे सांगत राजीनामे दिले, ही कृती अत्यंत चुकीची होती. त्यामुळे त्याचा फटका आयआयईला सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरState Governmentराज्य सरकारfundsनिधी