शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात

By नितीश गोवंडे | Updated: May 10, 2023 17:29 IST

दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार

पुणे : चार वर्षांपासून पुणे एसटी विभागाची रखडलेली भरती सुरू करण्यासाठी पुणे विभागातील पात्र उमेदवार दुसऱ्यांदा आझाद मैदानावर उपोषणासाठी बसण्याच्या तयारीत आहेत. याआधी २० फेब्रुवारी रोजी उमेदवार उपोषणाला बसले असता, त्यांना दोन महिन्यांमध्ये सर्व सुरळीत होईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण मे महिना उजाडला तरी एसटी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने हे उमेदवार पुन्हा १५ मे पासून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

एसटी महामंडळाने २०१९ सरळ सेवा भरती (दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी काढली होती) यामध्ये १२ विभागांची ४ हजार ४१६ जागांची चालत तथा वाहक पदाची जाहिरात निघाली होती. पुणे विभागाने आधी लेखी परीक्षा घेतली, कागदपत्र छाननी झाली, मेडिकल झाले, त्यामधून २ हजार ९८२ मुलांना १७ जानेवारी २०२० पासून भोसरी येथे वाहन चाचणीसाठी बोलवले होते. पण यातील २३०० मुलांची चाचणी झाल्यावर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रॅक बंद पडला व तेव्हापासून हा ट्रॅक बंदच आहे. या भरती मधील मुलांनी सतत यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्यासह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण एसटी महामंडळाने यावर आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या पात्र मुलांचे वय निघून जात असल्यामुळे, मुलांचे लग्न होत नसल्यामुळे, पुणे भागातील उमेदवार दुसऱ्यांदा आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.

पुणे विभागातील राहिलेल्या मुलांच्या ट्रायल तात्काळ घेऊन १ हजार ६४७ जागांची अंतिम निवड यादी जाहीर करावी, राहिलेल्या मुलांच्या ट्रायल पूर्ण करून भरती प्रक्रिया पूर्ण करा, मुलांच्या अंतिम निवड याद्या जाहीर करून तात्काळ प्रशिक्षण सुरू करा, प्रशिक्षण सुरू करताना जास्तीत जास्त गाड्यांची व्यवस्था करावी जेणेकरून मुलांचे तीन वर्ष भरून निघतील, या प्रमुख मागण्या या उमेदवारांच्या आहेत.

काय म्हणतात उमेदवार..

आज या राज्यात समृद्धी महामार्ग एवढा जलद गतीने झाला, महामेट्रोचे काम एवढ्या जलद गतीने होत आहे मग भोसरी येथील जेमतेम १०० मीटर चा ट्रॅक तयार करायला एसटी प्रशासनाला एवढे वेळ का लागत आहे, असा संतप्त सवाल या उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ट्रायल राहिलेल्या ७४२ आणि ट्रायल झालेल्या २ हजार २४० मुलांच्या भविष्यासोबत हे महामंडळ खेळत आहे. म्हणून आम्ही याआधी २० फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलो होतो. त्यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की, येणाऱ्या १ मेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तो ट्रॅक चालू करून तुमची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल. पण आतापर्यंत हा ट्रॅक दुरुस्त झालेला नाही किंवा मुलांना मेडिकलचे किंवा ट्रायलचे मेसेज आलेले नाहीत. यावरून असे लक्षात येते की एसटी महामंडळ दिलेला शब्दाला जागत नाही. दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहोत. आता आमची सहनशक्ती संपलेली आहे. भविष्यात याचा काही उद्रेक झाल्यास किंवा आमच्या जीवितास काही झाले तर याला सर्वस्वी राज्य सरकार, एसटी महामंडळाचे मुंबई आणि पुणे विभाग जबाबदार राहतील, असे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारST Strikeएसटी संपBus Driverबसचालकpassengerप्रवासी