शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भामा आसखेडच्या ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटींचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 13:14 IST

गेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळणारसर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेक

पुणे : शासनाच्या आदेशानुसार भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख या प्रमाणे पैसे वाटप  सुरु झाले असून, गेल्या चार महिन्यात सुमारे ३६७ प्रकल्पग्रस्तांना ३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य ३७ लाभार्थ्यांचे चेक तयार असून, कौटुंबिक वादामुळे हे चेक घेण्यासाठी कोणी आले नाहीत. तर अन्य सर्व लाभार्थ्यांना फाईल सादर होईल तसे वाटप सुरु आहे. त्यामुळे पुणे शहराला लवकरच भामा आसखेडचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने भामा आसखेडचे लाभक्षेत्र रद्द करुन धरणातील पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला. परंतु लाभक्षेत्र रद्द केल्यानंतर धरणामध्ये जमिनी केलेल्या शेतकऱ्यांच्या पुर्नवसनाबाबत त्यावेळच्या सरकारने कोणतही भूमिका जाहीर केली नव्हती. यामुळे खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणासाठी २००० मध्ये १ हजार ७०  हेक्टर जमीन संपादित केली होती. या धरणामुळे परिसरातील तब्बल १ हजार ६७३ शेतकरी कुटुंबे बाधित झाले आहेत. यापैकी २०१ शेतकऱ्यांनी शासनाने जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी यासाठी ६५ टक्के रक्कम भरली होती. त्यानुसार या २०१ खातेदारांना जमीन व पैशांच्या स्वरुपात मोबदला दिला आहे. परंतु जलसंपदा विभाग व पुनर्वसन विभाग यांच्यातील गोंधळामुळे आपल्याला १६/२ च्या नोटीसच देण्यात न आल्याने ३८८ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना त्वरित ६५ टक्के रक्कम भरून घेण्यासाठी १६/२ च्या नोटिसा देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गेल्या अडीच-तीन वर्षांत सरकार, जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर याबाबत तोडगा काढण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यां ºयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुर्नवसन अधिकाऱ्यांनी खास प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला. या प्रस्तावानुसार शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहमतीनुसार प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार ९ मे २०१९ पासून पात्र लाभार्थ्यांना पैसे वाटप सुरु आहे. यामध्ये एकूण ९०० लाभार्थ्यांपैकी ३६७ शेतकºयांना ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत शंभर टक्के शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुर्नवसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.---एजंटांमुळे पैसे वाटपामध्ये अडचणगेल्या अनेक वर्षांच्या संर्घषानंतर भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना अखेर पैसे वाटप सुरु झाले आहे. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या बदल्यात जमिन मिळण्यासाठी आंदोलन सुरु असून, बंद पाईपलाईनचे काम बंद करण्यात येत आहे. परंतु धरणाचेलाभक्षेत्र रद्द केल्याने शेतकऱ्यांना जमिन वाटप करण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळेच प्रशासनाकडून पैसे वाटप सुरु आहे. परंतु सध्या अनेक एजंट गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटत असून, अधिक पैसे मिळून देण्याची अमिषे दाखवत आहेत. यामुळे सध्या पैसे वाटप करण्यात अडचण येत आहे.---सर्व कागदपत्रे सादर केल्यास दोन दिवसांत चेकभामा आसखेडच्या पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही एजंट अथवा अन्य कोणालाही न भेटत सर्व कागदपात्रासह जिल्हा पुनर्वसन कार्यालयामध्ये अर्ज केल्यास केवळ दोन दिवसांत चेक संबंधित लाभार्थ्यांच्या हाता दिला जाईल. यासाठी मूळ प्रकल्पग्रस्ताने समक्ष येऊन संमतीपत्र, शपथपत्र व ओळखपत्रासाठी आधारकार्ड द्यावे. प्रकल्पग्रस्त मयत असेल तर वारस दाखला दिल्यास संबंधित प्रकल्पग्रस्ताला दोन दिवसांत वाटपाचा चेक देण्यात येईल.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी