शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खडकवासला साखळीत २५ टीएमसी पाणी;  पावसाचा जोर कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 12:33 IST

गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणात पाणी जमा होत आहे.

ठळक मुद्देउजनीत साडेबारा टीएमसी पाणीसाठागुरुवारी सायंकाळी खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर

पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणातपाणी जमा होत आहे. गुरुवारी सायंकाळी खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर (टीएमसी) गेला. जिल्ह्यातील धरणातून होत असलेल्या विसगार्मुळे उजनी धरणात १२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.  शनिवारी (दि. २७) रात्री पासून जिल्ह्यात काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. जवळपास पाच दिवस दमदार बरसल्यानंतर गुरुवारी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला. खडकवासला साखळीतील वरसगाव आणि पानशेत या दोनही धरणातील पाणीसाठा दहा टीएमसीच्या वर गेला आहे. टेमघर धरणात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत ५५, वरसगाव ४६, पानशेत ३८ आणि खडकवासल्यात ८ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत धरणात १०.१९ (९५.७३ टक्के) टीएमसी साठा झाला असून, धरण भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव धारणात १०.२० टीएमसी (७९.५७ टक्के), टेमघरमधे २.६१ टीएमसी (७०.४८ टक्के) आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. चारही धरणात मिळून २५ टीएमसी (८५.७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणातून मुठा नदीत २,५६८ क्सुसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यात ३,४२४ आणि दुपारी चार वाजता ९,४१६ क्सुसेक पाणी सोडण्यात येत होते. जिल्ह्यातील येडगाव धरणातून २१६५, वडज ८३७, चासकमान ७३२५, वडीवळे ७५३, आंद्रा १४६२ आणि कासारसाई धरणातून २०० क्सुसेकने पाणी सोडण्यात आले. सकाळी बंडगार्डन बंधाºयाजवळ १८ हजार २२१ क्सुसेकने होणारा विसर्ग सायंकाळी सहा पर्यंत २२ हजार ५५ क्युसेकपर्यंत वाढला होता. तर, दौंड येथे हा विसर्ग २४ हजार ३४८ क्सुसेक होता. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाच पर्यंत धरणात ७.१६ टीएमसी साठा होता. त्यात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत १२.५९ टीएमसी (२३.५० टक्के) पर्यंत वाढ झाली.   -- गुंजवणी, नीरा-देवघरचा साठा ८० टक्क्यांवरगुंजवणी धरणपाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात २६, निरा देवघर १९, भाटघर २५, वीर ९ आणि नाझरे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणी धरणात ३.४९ (९२ टक्के), निरा देवघर ९.९१ (८४ टक्के), भाटघर धरणात १९.१० टीएमसी (८१ टक्के) आणि वीर धरणात ९ टीएमसी (९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी