शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राज्यात अवकाळीमुळे १३७९ कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा

By नितीन चौधरी | Updated: December 29, 2023 11:20 IST

राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार

पुणे: नोव्हेंबर अखेरीस झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील सुमारे १२ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे १,३७९ कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. राज्य आपत्ती निर्मूलन निधीतून ही भरपाई देण्यात येणार असून, याचा लाभ राज्यातील २३ लाख ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सुमारे २४ लाख शेतकऱ्यांना फटका

अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर तब्बल दीड महिना उलटूनही राज्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे रखडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने तातडीने हा अहवाल पूर्ण करून राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार राज्यातील १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या आपत्तीमुळे राज्यातील २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालानुसार १३७९ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

अकोल्यात सर्वाधिक नुकसान

अवकाळीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला असून, येथील १ लाख ८८ हजार ४२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६९६ हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १८१ क्षेत्र बाधित झाले आहे, तसेच सर्वाधिक २ लाख ९७ हजार ९७२ बाधित शेतकरी अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ५७५ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ९६४ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. आर्थिक मदतीचा विचार करता सर्वाधिक २०८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०६ कोटी ३३ लाख रुपये नुकसानीपोटी मिळतील. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७ कोटी ७५ लाख रुपये मिळतील.

अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मदत लवकर जाहीर झाल्यास त्वरेने शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल. - दिलीप झेंडे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, पुणे

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSocialसामाजिकGovernmentसरकारMONEYपैसाenvironmentपर्यावरणRainपाऊस