शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

देहूत १२ एकर ऊस जळून खाक, १५ ते १६ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 15:39 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला

देहूगाव: येथील काळोखे मळ्यातील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे १२ एकर ऊस जळून खाख झाला असून ९ शेतकऱ्यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काही आब्याची व नारळाच्या झाडासंह कादा पिकाचे ही नुसकान झाले आहे. ही घटना सोमवार दि. २६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून ही आग संरक्षण विभागाच्या डेपोपासुन अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर लागली होती. ही आग विझविण्यात अपयश आले असते तर मोठा अनर्थ झाला असता. यावेळी संरक्षण विभागाच्या डीएडी डेपोच्या संरक्षक कुंपनाच्या आतील बाजुला दोन अगीचे बंब व लष्कराचे जवान सज्ज होते. परंतू सुदैवाने ही आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळाला.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथील शेतकरी रामदास तुकाराम काळोखे,  सचिन बाळासाहेब काळोखे, अभिजित सुदाम काळोखे, महेश मधुकर काळोखे, बबन लक्ष्मण काळोखे, खंडू सखाराम काळोखे, गणेश तुकाराम काळोखे, बाजीराव गोविंद काळोखे, गोपाळ गेणूजी काळोखे या नऊ शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. ही आग येवढी भयंकर होती की सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुनही दिसत होती. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमामात उसळत होत्या. त्यामुळे आग विझविण्यासाठी कोणी धजावत नव्हते. त्यामुळे तातडीने देहू नगरपंचायतीच्या अग्नीशमन विभागाला बोलावण्यात आले. अग्नीशमन दलाच्या ४ कर्मचाऱ्यानी एका बंबाच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. देहूगाव येथीळ काळोखे मळ्यात प्रामुख्याने शेतकरी ऊस हे नगदी पीक घेतात. हा सगळा ऊस येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जात असतो. त्यामुळे यंदा या शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. या आगीमुळे या शंतकऱ्यांच्या बांधावरील आंब्याची सात आठ झाडे व नारळाची आठ ते नऊ झाडे जळाली आहेत. याशिवाय या शेताच्या शेजारील शेतात असलेल्या कांदा पिकाला या आगीची झळ पोहचली आहे.

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूfireआगsugarcaneऊसMONEYपैसाFarmerशेतकरी