शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 20:27 IST

Shivsena Vardhapan Din: गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. जर सत्तेसाठी कोणी कासावीस झाले असतील तर शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जाणार नाहीजे राजकारण करायचं असेल ते शिवसेनेच्या टर्मवर राजकारण करू.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकांत एकटं लढण्याची भूमिका घेत आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य करत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला एकप्रकारे इशारा दिला आहे.

स्वबळाच्या बाबतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कुणाची पालखी वाहणार नाही, स्वबळ हे महाराष्ट्राच्या हितासाठी हवं असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे सरकार आहे. शिवसेना स्वत:च्या अटी आणि शर्तीवर राजकारण करणार आहे. हा इशारा अप्रत्यक्षपणे भाजपालाही देण्यात आला आहे. शिवसेनाही स्वबळावर निवडणूक लढू शकते असं भाषणातून दिसून येत आहे. जे राजकारण करायचं असेल ते शिवसेनेच्या टर्मवर राजकारण करू. महाराष्ट्रात स्वबळावर कोणत्याही पक्षाला सत्ता आणता येत नाही. भाजपालाही आणि काँग्रेसलाही ते शक्य नाही. जे वास्तव आहे ते स्विकारा असा इशारा उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षांना दिला आहे असं लोकमतचे वरिष्ठ संपादक संदीप प्रधान यांनी सांगितले.

त्याचसोबत गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर जर सत्तेसाठी कोणी कासावीस झाले असतील तर शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जाणार नाही हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. भाजपा राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतं. शिवसेनेने पुढे काय करायचं हे मी ठरवणार आहे. मी कुणाची पालखी वाहणार नाही हे वाक्य त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी आणि भाजपाला उद्देशून म्हटलं, कोणीही मला गृहित धरू नये हेच त्यांना सांगायचं आहे असंही संदीप प्रधान म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊन जास्त जागा पदरात पाडण्याचं काँग्रेसचं राजकारण असेल मात्र एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शिवसेना तडजोड करायला तयार आहे. पण जास्त मागणी झाल्यास शिवसेना कोणाची पालखी वाहणार नाही असं अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीबाबत जपतानाच आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राम मंदिरावर कुठेही भाष्य केलेले नाही. त्याचसोबत भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांबाबतही थेट टार्गेट करणं टाळलं आहे. राम मंदिराच्या जमीन खरेदीत जे आरोप होत आहेत. त्यावर काही बोलले नाही. कारण त्यावर बोलणं म्हणजे संघाची नाराजी ओढावून घेणे हे त्यांनी केले नाही. भविष्यात शिवसेनेला पर्याय हवा असेल तर राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळलं आहे. लसीकरण धोरणांवर काही बोलले नाही. आजच्या भाषणात हा समतोल राखून त्यांनी एक वेगळ्याप्रकारचे संकेत दिले असावेत असंही संदीप प्रधान यांनी सांगितले.  

पाहा व्हिडीओ 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरHinduहिंदू