शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:45 IST

बारामतीत आज पवार कुटुंबीयांची बैठक; परिवारात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न

- अतुल कुलकर्णी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड-उघड दोन गट पडले असून बहुतांश नेते शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी बारामती येथे कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील गोडवा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्याविषयी आणि ते करत असलेल्या कृत्याविषयी काही गोष्टी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दल काय बोलतात, हे शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे समजते.पक्षात पार्थविषयी का आहे नाराजी?मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर काही नेत्यांनी पार्थला मतदार- संघातील लोकांच्या संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. मात्र पार्थ तिकडे फिरकलाच नाही. अजित पवार यांचे सोशल मीडिया पार्थच हाताळत होता. पक्षातल्या काही नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणे असे प्रकारही पार्थच्या सांगण्यावरून घडले. नेत्यांच्या बाबतीत पार्थचा होणारा हस्तक्षेपदेखील शरद पवार यांच्या नाराजीचे कारण ठरला, असेही सूत्रांनी सांगितले.आजोबांनी घेतली नातवाची ‘शाळा’!गुरुवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आपल्याला तीच भूमिका घ्यावी लागेल, माझ्या कुटुंबातील व्यक्तीनेच त्याला छेद देणारी भूमिका घेणे पक्षहिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी पार्थची ‘शाळा’ घेतल्याचे समजते.हा तर पवार कुटुंबातील प्रश्नहा पूर्णपणे पवार कुटुंबातला प्रश्न आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणाशी विसंगत भूमिका जर कोणी मांडत असेल, त्यामुळे संभ्रम निर्माण होत असतील, तर वडीलधाऱ्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवार हे कुटुंबाचेच नव्हे, तर राष्ट्रवादी कुटुंबाचे प्रमुख आहेत. ते जर काही बोलले असतील तर त्यात परिवाराचा विषय म्हणून बघितले पाहिजे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्षसुप्रिया सुळे यांच्या भेटीगाठी वाढल्यापार्थवरून सुरू झालेल्या ‘महाभारता’चे पर्यवसान कौटुंबिक आणि पक्षीय कलहात होऊ नये यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारJayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड