शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:45 IST

बारामतीत आज पवार कुटुंबीयांची बैठक; परिवारात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न

- अतुल कुलकर्णी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड-उघड दोन गट पडले असून बहुतांश नेते शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी शनिवारी बारामती येथे कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील गोडवा कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्याविषयी आणि ते करत असलेल्या कृत्याविषयी काही गोष्टी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दल काय बोलतात, हे शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे समजते.पक्षात पार्थविषयी का आहे नाराजी?मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर काही नेत्यांनी पार्थला मतदार- संघातील लोकांच्या संपर्कात राहा, असा सल्ला दिला होता. मात्र पार्थ तिकडे फिरकलाच नाही. अजित पवार यांचे सोशल मीडिया पार्थच हाताळत होता. पक्षातल्या काही नेत्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणे असे प्रकारही पार्थच्या सांगण्यावरून घडले. नेत्यांच्या बाबतीत पार्थचा होणारा हस्तक्षेपदेखील शरद पवार यांच्या नाराजीचे कारण ठरला, असेही सूत्रांनी सांगितले.आजोबांनी घेतली नातवाची ‘शाळा’!गुरुवारी रात्री उशिरा पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, आपल्याला तीच भूमिका घ्यावी लागेल, माझ्या कुटुंबातील व्यक्तीनेच त्याला छेद देणारी भूमिका घेणे पक्षहिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी पार्थची ‘शाळा’ घेतल्याचे समजते.हा तर पवार कुटुंबातील प्रश्नहा पूर्णपणे पवार कुटुंबातला प्रश्न आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणाशी विसंगत भूमिका जर कोणी मांडत असेल, त्यामुळे संभ्रम निर्माण होत असतील, तर वडीलधाऱ्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवार हे कुटुंबाचेच नव्हे, तर राष्ट्रवादी कुटुंबाचे प्रमुख आहेत. ते जर काही बोलले असतील तर त्यात परिवाराचा विषय म्हणून बघितले पाहिजे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्षसुप्रिया सुळे यांच्या भेटीगाठी वाढल्यापार्थवरून सुरू झालेल्या ‘महाभारता’चे पर्यवसान कौटुंबिक आणि पक्षीय कलहात होऊ नये यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारJayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड