शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 11:46 IST

West Bengal: काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे.

ठळक मुद्देकाही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झालाजमिनीवरील परिस्थिती माहिती घेतली नाहीसुवेंदू अधिकारी यांचा भाजपला घरचा अहेर

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन महिने उलटून गेले, तरी राजकीय वर्तुळात यासंदर्भातील चर्चा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले काही नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर भाजपवर विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी करण्यात आली. आता मात्र ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटून विजयी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनीच आता भाजपला घरचा अहेर दिला आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. (suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders) 

सुवेंदू अधिकारी हे भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंदू अधिकारी यांच्या जास्तच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच पक्षाचा पराभव झाला. अती आत्मविश्वासामुळे मूळ जमिनीवर असणारी परिस्थिती समजून घेता आली नाही, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी चांदीपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुनावले.

भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

जमिनीवरील परिस्थिती माहिती घेतली नाही

आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र, त्यानंतर आपल्या काही नेत्यांना भाजपला १७० ते १८० जागा सहज मिळवेल, असा विश्वास वाटू लागला. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे अधिकारी म्हणाले. 

नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कल्याणकारी प्रकल्प आणि विकासाच्या कामांचा सुवेंदू अधिकारी यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. भाजप स्वप्नात जगत आहे, कारण त्यांच्या अनेक नेत्यांनी २०० हून अधिक जागा मिळतील असे वाटले होते. ते इतरांमध्ये दोष का शोधत आहेत? सुवेंदू अधिकारी यांनीदेखील १८० जागा मिळतील असे वारंवार म्हटले होते. खरे तर त्यांनी बंगालची मुख्य नाडी माहिती नाही, जी तृणमूल काँग्रेसला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया कुणाल घोष यांनी दिली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण