शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:30 IST

Sushant Singh Rajput: या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवावं असा निर्णय बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला. सुशांतचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहावा अशी आग्रही मागणी सत्ताधारी शिवसेनेची होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.

मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. याला कारण म्हणजे सुशांतच्या सीबीआय चौकशीवरुन २ घटना प्रखरतेने लक्षात आल्या. त्याम्हणजे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यूची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केली.

पार्थ पवार इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन निवेदनही सादर केलं. पार्थ पवार याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन आजोबा शरद पवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली होती. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युर आहे अशा शब्दात शरद पवारांनी फटकारलं होतं. शरद पवारांच्या अशा भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारही नाराज असल्याचं सांगितले जात होते. तो लहान आहे, हळूहळू कळेल, पण जाहिररित्या असं त्याला बोलणं योग्य नव्हे असं मत अजित पवारांचे होते.

शरद पवारांनी पार्थबाबत केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा पवार कुटुंबातील मतभेदावर चर्चा सुरु झाली. पार्थ पवारांनी कुटुंबातील नातेवाईकांच्या भेटीगाठी सुरु केल्या. पार्थ लवकरच मोठा निर्णय घेईल असंही सांगितलं जात होतं. पार्थ पवार यांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांसोबतही पार्थ पवारांची भेट झाली होती. पार्थ प्रकरणात सर्वकाही आलबेल आहे अस चित्र उभं केलं गेले. त्यानंतर या वादावर पडदा पडणार असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ यांनी केलेलं सत्यमेव जयते या ट्विटचे अनेक अर्थ काढण्यासारखे आहेत. एकीकडे राज्य सरकार या निर्णयावर सल्लामसलत करत असताना खुद्द शरद पवार यांच्या नातूने अशाप्रकारे ट्विट केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. कारण जाहिररित्या आजोबांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी त्यांची भूमिका योग्य असल्याचं ट्विटमधून मांडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.   

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे बंधू आहेत. यापूर्वी अजितदादांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा शपथविधी उरकल्यानंतर अजित पवार हे बंधू श्रीनिवास पवार यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी मुक्कामी होते. शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थने श्रीनिवास पवार यांचीही भेट घेतली. एकेकाळी श्रीनिवास पवार यांच्यावर मुंबई सकाळची जबाबदारी होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण

शिवलिंग प्राप्तीसाठी बंद खोलीत दोन भावांची अघोरी प्रथा; एकाचा मृत्यू झाला अन् दुसरा...

आता नोकरीसाठी केवच एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा विषय नाही, तपास कमी पडला; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे षडयंत्र; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले...

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSharad Pawarशरद पवार