शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गृहमंत्री बदलण्यााबाबत जयंत पाटील यांनी दिले असे संकेत दिले, अनिल देशुमखांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:32 IST

Home Minister and Mumbai Police Commissioner will change : सचिन वाझे प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी (mukesh ambani explosive news) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (State Home Minister and Mumbai Police Commissioner will not change, informed Jayant Patil)

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही. 

सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री अनिल देशमुख हे योग्य प्रकारे काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं होतं, तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांपासून इतर सत्ताधारी आमदारांनी वाझेंची पाठराखण केली होती, इतकचं नव्हे तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता. सध्या NIA कडून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने NIA ने त्यांना अटक केली आहे, यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसPoliticsराजकारण