शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छोट्या पक्षांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:34 IST

पवार-चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात विरोधी पक्षांची आघाडी तयार करणे, हे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासाठी दु:स्वप्न ठरताना दिसत आहे. छोटे पक्ष दोन्ही काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.शरद पवार यांच्याकडे आघाडीची जबाबदारी आहे. छोट्या पक्षांना समजावण्यात त्यांना अडचण येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला ४ जागा देण्याची दोन्ही काँग्रेसची तयारी आहे. आंबेडकर १२ जागा मागत आहेत. राजू शेट्टींसाठी एक जागा देण्यास राष्ट्रवादी तयार असून, काँग्रेस आपल्या कोट्यातील जागा देण्यास तयार नाही. बहुजन विकास आघाडीस काँग्रेस जागा सोडायला तयार नाही.ओवेसी यांचा एमआयएम बहुजन वंचित आघाडीत असला, तरी राज्यात एकही जागा लढविणार नाही. पण, आंबेडकर हे ओवेसी यांच्या हातचे बाहुले बनल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटते. त्यांची आघाडी भाजपाच्या इशाऱ्यावर मतविभागणीचा प्रयत्न करते, असा काँग्रेस-राष्ट्रवादीला संशय आहे. आंबेडकरांना ४ जागा मिळू शकतात; पण त्यांना ८ जागा हव्या आहेत. सपा-बसपाला कोणत्या जागा द्यायच्या, हाही प्रश्न आहे. शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. तथापि, सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्यात त्यांना यश न आल्याने आघाडीत बिघाडी होईल की काय, अशी चर्चा सुरू आहे.प्रफुल्ल पटेल रिंगणात नाहीत?राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते राज्यसभेचे सदस्य असून, त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन काहीच साध्य होणार नाही, असे पक्षाला वाटते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन