शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 13:07 IST

Satara Ranjit Deshmukh joined Congress News: रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही.

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतं. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सहकार क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारे शिवसेनेचे युवा नेते रणजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळ दौऱ्याचं योग्यरित्या त्यांनी नियोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधून बाहेर पडत रणजित देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माण-खटाव यासारख्या दुष्काळी भागात जवळपास ७० चारा छावण्या सुरू करून रणजित देशमुखांनी मोठा दिलासा दिला होता. मात्र काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कोणत्याच राजकीय पक्षात सक्रीय नव्हते. अखेर त्यांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. रणजित देशमुख यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कराडमध्ये ३५ वर्षाचे राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या दिलजमाई झाली. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय. आज विलासकाका उंडाळकर यांच्या चिरंजीवानेही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली. १९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले. मात्र आता काँग्रेस हळूहळू संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRanjit Deshmukhरणजित देशमुखShiv SenaशिवसेनाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात