शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 13:07 IST

Satara Ranjit Deshmukh joined Congress News: रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही.

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतं. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सहकार क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारे शिवसेनेचे युवा नेते रणजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळ दौऱ्याचं योग्यरित्या त्यांनी नियोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधून बाहेर पडत रणजित देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माण-खटाव यासारख्या दुष्काळी भागात जवळपास ७० चारा छावण्या सुरू करून रणजित देशमुखांनी मोठा दिलासा दिला होता. मात्र काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कोणत्याच राजकीय पक्षात सक्रीय नव्हते. अखेर त्यांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. रणजित देशमुख यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कराडमध्ये ३५ वर्षाचे राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या दिलजमाई झाली. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय. आज विलासकाका उंडाळकर यांच्या चिरंजीवानेही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली. १९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले. मात्र आता काँग्रेस हळूहळू संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRanjit Deshmukhरणजित देशमुखShiv SenaशिवसेनाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात