शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शिवसेनेचा 'जय बांगला'चा धाडसी नारा, पण जनतेच्या मनातील 'त्या' रागावर काय उतारा? 

By यदू जोशी | Updated: January 18, 2021 11:52 IST

West Bengal Election, Shiv Sena: बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतरही पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात शिवसेना निवडणूक का लढवत आहे असा प्रश्न उपस्थित होतो.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा निर्णय अनाकलनीय आहे.पश्चिम बंगालमध्ये सामान्य माणसांत आपल्या माणसांना विरोध करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे.महाराष्ट्रात सत्ता मिळवणारी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न पाहत आहे

यदु जोशी 

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेने भाजपावर मात केली आणि राज्यात मुख्यमंत्रिपद पटकावलं. अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने घरोबा केला. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता शिवसेनेने मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ४० उमेदवार उभे केले होते. यात जवळपास सर्वच जागांवर शिवसेना उमेदवारांना सपाटून मार खावा लागला, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. इतकं असूनही शिवसेनेने आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचे कोणतेही नेटवर्क नाही, शाखा नाही, काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, परंतु राज्याच्या राजकारणावर शिवसेनेचा कोणताही प्रभाव नाही, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला प्रतिनिधित्व नाही. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि भाजपा या ४ पक्षांचा बोलबाला आहे. तर बिहारमध्ये ५ जागा जिंकून MIM ची नोंद घेण्यास भाग पाडणारे असदुद्दीन औवेसी पश्चिम बंगालमध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार आहेत. 

हिंदुत्ववादी शिवसेनेचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कितपत प्रभाव जाणवेल याबाबत 'लोकमत डॉट कॉम'ने हिंदुस्तान टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्याशी चर्चा केली. प्रदीप मैत्र हे मूळचे बंगाली आहे, बंगालचं राजकारण, समाजकारण, साहित्य या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा निर्णय अनाकलनीय आहे. बिहारसारखी गत शिवसेनेची पश्चिम बंगालमध्ये होईल असं सध्याचं चित्र आहे. तरीही शिवसेनेचा निर्णय धाडसाचा म्हटला पाहिजे. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शिवसेनेने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत अनेकदा बांगलादेशी घुसखोर हाकला, अशी मागणी करत शिवसेनेने आक्रमक आंदोलन केली आहेत. ही पार्श्वभूमी पाहता पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेविरुद्ध राग, आकस आहे, याकडे मैत्र यांनी लक्ष वेधलं. पश्चिम बंगालमध्ये असो वा बांगलादेशातून जी माणसं छळाला कंटाळून मुंबईत गेली आहेत, त्यात फक्त मुस्लीम नव्हे तर हिंदूंचादेखील समावेश आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सामान्य माणसांत आपल्या माणसांना विरोध करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. यामुळे शिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये स्थानिक नागरिक स्वीकारतील असं वाटत नाही, असं मत त्यांनी मांडलं.

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे एनडीएच्या उमेदवाराऐवजी यूपीएच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. त्यानंतर, प्रणवदांनी 'मातोश्री'वर येऊन बाळासाहेबांची भेटही घेतली होती. या एका प्रसंगाशिवाय, शिवसेना आणि पश्चिम बंगाल यांचं तसं काहीच नातं नाही.  

शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न 

बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतरही पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात शिवसेना निवडणूक का लढवत आहे असा प्रश्न उपस्थित होतो, त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रात सत्ता मिळवणारी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणाचं स्वप्न पाहत आहे. पक्षाची कक्षा ओलांडावी असं नेतृत्वाला वाटू लागले आहे. संजय राऊत यांनी मध्यंतरी विधान केले होते, उद्धव ठाकरेंना देशाचे पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्रात १५-२० खासदार निवडून आणून राष्ट्रीय राजकारणात छाप पडणार नाही. तर बाहेरच्या राज्यातही कुठे ना कुठे अस्तित्व दाखवावं लागेल असं शिवसेनेला वाटत आहे. परंतु. राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे स्वप्न आणि सध्याची वस्तुस्थिती यात विसंगती आहे. कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे नेटवर्क लागते ते शिवसेनेकडे नाही. राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची इच्छा आणि इतर राज्यात जनाधार नसणे हे वास्तव अशा स्थितीत शिवसेनेची नौका महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात हेलकावे खात राहील, असंच आत्तातरी म्हणावं लागेल.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाwest bengalपश्चिम बंगालcongressकाँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHindutvaहिंदुत्व