शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Anil Deshmukh:“होय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 10:55 IST

BJP Kirit Somaiya Target CM Uddhav Thackeray and NCP Sharad pawar: अनिल देशमुखांनी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे.

ठळक मुद्देसचिन वाझेंनी जे केलं, परमबीर सिंग यांनी जे केल, तसेच अनिल देशमुखांनी करावे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं थेट सांगावंसीबीआय चौकशीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार का घाबरतात?

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर आरोप करत १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचं म्हटलं होतं. या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहचलं आणि हायकोर्टाने आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सीबीआयकडून होणार आहे. यात काही तथ्य आढळल्यास FIR नोंदवण्यात येणार आहे.

मात्र अनिल देशमुखांनी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझेंनी जे केलं, परमबीर सिंग यांनी जे केल, तसेच अनिल देशमुखांनी करावे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं थेट सांगावं. यात आणखी ४ लाभार्थ्यांची नावं बाहेर येतील. माझ्याकडे याचे पुरावे आहेत असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. त्याचसोबत सीबीआय चौकशीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार का घाबरतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ABP माझानं हे वृत्त दिलंय

काय होता परमबीर सिंगाचा आरोप?

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.

‘हे’ देशानं पहिल्यांदाच पाहिलं

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री हप्ता वसूली करताना पाहिलं आहे असा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे

सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये

कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे. एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती, असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगSharad Pawarशरद पवारCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे