शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचे नेत्यांना ‘पाव....पाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:07 IST

पितृपक्षातच रणधुमाळी : अर्ज भरण्याची प्रक्रियाही पितृपक्षात राहणार

- सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही पितृपक्षातच सुरू राहणार आहे. एरव्ही अर्ज दाखल करण्यासाठी पितृपक्ष कधी संपेल, याची इच्छुकांना प्रतीक्षा असते. यंदा मात्र कोणाची इच्छा असो की नसो, सर्वांना पितृपक्षातच अर्ज दाखल केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे इच्छुकांची थोडी धाकधूक वाढली आहे.


२०१४ च्या विधानसभा निवडणूक रणधुमाळीही पितृपक्षातच होती. २०१४ मध्ये १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली होती. १५ आॅक्टोबरला मतदान आणि १९ आॅक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल लागला होता. त्यावेळी ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष होता. तशीच परिस्थिती यंदाही राहण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार १६ किंवा १९ सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर एक-दोन दिवसांनी अधिसूचना प्रसिद्ध होते. त्यानंतर ९ ते १० दिवसापर्यंत अर्ज दाखल करता येतात. १९ सप्टेंबरला किंवा त्याआधी अधिसूचना प्रसिद्ध झाली तर त्यानंतर दहा दिवसात २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तोपर्यंत पितृपक्ष संपलेला असेल. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या तारखा असू शकतील.

२९ सप्टेंबरला घटस्थापना आहे. आतापासूनच इच्छुकांनी या पितृपक्षाची धास्ती घेतलेली आहे. आधीच पक्षांतरामुळे धास्तावलेले इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. पितृपक्षात नेमका कोणता मुहूर्त चांगला असेल, याची चाचणी इच्छुकांकडून सुरू झालेली दिसते.


पितृपक्षात पितर घरी जेवण्यासाठी यावेत, यासाठी ‘पाव पाव’ करीत कावळ््यांना आवाहन केले जाते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांकडे आता उमेदवारी मिळविण्यासाठी ठाण मांडलेले आहे. आता नेते कधी पावणार आणि तिकिट कधी मिळणार याचीच इच्छुकांना प्रतिक्षा लागली आहे.

पितृपक्ष फलदायीच
पितृपक्षामध्ये विवाह, मुंज आणि वास्तुशांती हे तीन कार्य करू नयेत. पितृपक्षात पितरांचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासारखी कामांनाही पितृपक्षात अशुभ म्हणता येणार नाही. पितृपक्षात येणारी निवडणूक प्रक्रिया यामध्ये अशुभ समजण्याचे कारण नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण