शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाविरोधातील मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना बजावली नोटीस

By प्रविण मरगळे | Updated: November 25, 2020 22:19 IST

MNS Morcha, Police News: मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील

मुंबई – भरमसाठ वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेचा उद्या राज्यभरात मोर्चा होणार असून मुंबई आणि ठाण्यात मनसे ताकदीनं मोर्चा काढणार आहे, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा धडकणार आहे, वीजबिलात सरकारने सुरुवातीला सवलत देऊ असं जाहीर केले परंतु त्यानंतर सरकारने घुमजाव केल्याने मनसेनं हा मोर्चा काढला आहे.

मुंबईत होणाऱ्या या धडक मोर्चाला शहरातून मनसे कार्यकर्ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील, याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमतील त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ शकतं, तसेच याच जवळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री हे निवासस्थान असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

तर दुसरीकडे उद्या दुपारी १ वाजता ठाण्यातील मनसेच्या मोर्चाला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली. बुधवारी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आपण काढत असलेल्या मोर्चास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले आले. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी लोकांच्या हितासाठी हा मोर्चा निघणार असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी

आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत मनसेचे संदीप देशपांडे यांनी घणाघात केला होता. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.

तर पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सर्वच राजकीय पक्षांना समज द्यावी, आंदोलन करून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि मनसेचं नाव न घेता त्यांच्या आंदोलनावर भाष्य केले होते.

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज