शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Pegasus spyware: नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाली, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 4:04 PM

Pegasus spyware attack: केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे

ठळक मुद्दे'भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही'

नवी दिल्ली: सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस(Pegasus spyware) या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. 'भाजप सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, उलट मनमोहन सिंग यांच्याच काळात फोन टॅप झाले', असा दावा फडणवीसांनी केलाय. 

पेगसासद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यांनी केला. यासंबंधी बातम्या समोर आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 'फोन टॅपिंग नरेंद्र मोदींच्या काळात नाही, तर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना नरेंद्र मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे. पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मनमोहन सिंगांकडून समर्थनफडणवीस पुढे म्हणाले की, भारतातील टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ फोन टॅपिंग करण्याची गरजच नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, आणि जे काम झालंय ते लिगली झालंय, अस त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

देशाच्या बदनामीचा अजेंडाफडणवीस पुढे म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची होत आहे. हे जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून होत आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग मिळतीये आणि त्यातून एक बदनामीचा अजेंडा राबवला जातोय. हे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस