शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

“...यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ काँग्रेस अध्यक्ष करावं; चमत्कार नक्कीच घडेल”

By प्रविण मरगळे | Published: November 23, 2020 3:22 PM

Congress Internal Controversy, Rahul Gandhi, Kapil Sibal, Gulabnabi Azad, Sanjay Nirupam News: काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेतमेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेतृत्वाबद्दल पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीला नेतृत्वाला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात गांधी कुटुंबाचं वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

याबाबत संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भाजपा तामिळनाडू आणि बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे, तर आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत लढत आहेत. हे तेच नेते आहेत,ज्यांनी इतकी वर्ष काँग्रेस कार्यकारणी समितीवर कब्जा ठेवला आहे. काही चांगले झाले तर त्याचा उपभोग घ्यायचा आणि खराब झालं तर त्याच्यावर टीका करायची. ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्त्वावर ढासळत असलेला विश्वास काँग्रेसला कमकुवत करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व कंबर कसून तयार होत नाही, तोपर्यंत खालच्या स्तरात कमकुवत शक्ती आणि कोंडी कायम राहणार आहे. यावर एकच उपाय म्हणजे राहुल गांधींना तात्काळ अध्यक्ष बनवावं, संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत, मेहनती आणि उत्साही नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे, चमत्कार नक्कीच घडेल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसला नवीन दृष्टीकोनाची गरज आहे, काँग्रेसने नेहमीच नवीन कल्पना आणि दृष्टीकोन देशासमोर ठेवला आहे. यामुळेच देशाचे भले झाले असून पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या नवीन अवताराची देशाला गरज आहे, आम्ही जुनं नाकारात नाही परंतु बदल एक नैसर्गिक सत्य आहे असंही संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

गुलाब नबी आझादांची टीका

नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.

 कपिल सिब्बलही नाराज

राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या असं सांगत कपिल सिब्बल यांनीही नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Nirupamसंजय निरुपमkapil sibalकपिल सिब्बलElectionनिवडणूक