शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बापरे! नितीशकुमार मुख्यमंत्री होताच हाताचे चौथे बोट तोडले; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 11:18 IST

Bihar Election : जदयूला गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा मिळाल्याने भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देत भाजपाने वेगळीच खेळी खेळली आहे.

बिहारच्या निवडणुकीत कमी फरकाने नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले आहे. जदयूला गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा मिळाल्याने भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद देत भाजपाने वेगळीच खेळी खेळली आहे. याच दरम्यान, बिहारच्या जहानाबादमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री होताच एका व्यक्तीने चौथे बेट तोडले आहे. 

जहानाबादच्या अनिल शर्मा य़ांनी त्यांचे बोट कापून गोरैया बाबांच्या मंदिरावर चढविली. अशाप्रकारे त्यांनी चार बोटे नितीशकुमार मुख्यमंत्री होताच कापली आहेत. कारण नितीशकुमार हे त्यांचे आवडीचे नेते आहेत. ही घटना जहानाबादच्या घोसी पालीस ठाणे क्षेत्रातील वैना गावाची आहे. 45 वर्षांचे अनिल शर्मा उर्फ अली बाबा यांनी याआधी तीन बोटे कापली आहेत. 16 नोव्हेंबरला नितीशकुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. यामुळे शर्मा यांनी पुन्हा चौथे बोट कापले.

 वैना गावच्या या अनिल शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून आपले बोट कापून घेत आहेत. नितीशकुमार जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा तेव्हा त्यांनी बोट कापून गोरैया बाबांच्या मंदिरावर चढविले आहे. नेहमीप्रमाणे शर्मा यांनी यावेळीही नितीशकुमारच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून गाऱ्हाणे घातले होते. हे त्यांची मागणी देवाने ऐकली, या भावनेतून त्यांनी आणखी एक बोट कापले आहे. 

नितीश कुमार सरकारला झटका; ७२ तासांत मंत्र्याचा राजीनामाडॉ. मेवालाल चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण राजद पक्षाने मेवालाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारमध्ये भरती घोटाळ्यातील आरोपीला थेट कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं, यावर बोट ठेवून लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. विरोधकांच्या जोरदार टीकेनंतर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नवनियुक्त शिक्षण मंत्री मेवालाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास अर्धातास झालेल्या या बैठकीनंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात होते. अखेर आज मेवालाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच्या काळात पदाचा गैरवापर करुन नियुक्ती केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण भागलपूर एडीजी-१ यांच्याकडे विचारधीन असून अद्याप चार्चशीट दाखल झालेली नाही. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNitish Kumarनितीश कुमारChief Ministerमुख्यमंत्रीBiharबिहारBJPभाजपा