शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नाना पटोलेंनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन; काँग्रेस करणार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 12:12 IST

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

इंदापूर – राज्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष(Congress-NCP) असले तरी संधी मिळताच दोघंही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना(Nana Patole) राज्यातील काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं सरकार असलं तरी काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात.

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेइंदापूरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. नाना पटोलेंनी पुढील निवडणुकीत इंदापूरात काँग्रेसचाच आमदार असेल असा दावा केला आहे. इंदापूरची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी नेहमी महत्वाची असते.

याठिकाणी भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील(BJP Harshawardhan Patil) हे काँग्रेसचे आमदार होते. हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याने भाजपात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील या मतदारसंघातून नेतृत्व करत होते. परंतु मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. दत्तात्रय भरणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार दोघांचेही टेन्शन वाढवलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला लोकं मानतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल. त्याचसोबत जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. मात्र संधी साधूसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे. सत्तेसाठी नाही अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे असा दावा नाना पटोलेंनी केला.

टॅग्स :IndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार