शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नाना पटोलेंनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन; काँग्रेस करणार थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडावर हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 12:12 IST

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

इंदापूर – राज्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष(Congress-NCP) असले तरी संधी मिळताच दोघंही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना(Nana Patole) राज्यातील काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं सरकार असलं तरी काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात.

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेइंदापूरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. नाना पटोलेंनी पुढील निवडणुकीत इंदापूरात काँग्रेसचाच आमदार असेल असा दावा केला आहे. इंदापूरची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी नेहमी महत्वाची असते.

याठिकाणी भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील(BJP Harshawardhan Patil) हे काँग्रेसचे आमदार होते. हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याने भाजपात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील या मतदारसंघातून नेतृत्व करत होते. परंतु मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. दत्तात्रय भरणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार दोघांचेही टेन्शन वाढवलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला लोकं मानतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल. त्याचसोबत जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. मात्र संधी साधूसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे. सत्तेसाठी नाही अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे असा दावा नाना पटोलेंनी केला.

टॅग्स :IndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार