शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:28 PM

आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः देशात जोरदार प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या वेळच्या तुलनेत एनडीएच्या 4 जागा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा युतीला 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काँग्रेस आघाडीला 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014ला एनडीएला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या, यूपीएला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेना-भाजपाच्या चार जागा घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2014मध्ये सेना-भाजपाला 51.3 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेस आघाडीच्या खात्यात 34.1 टक्के मतं जमा झाली होती. तर यंदा सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारी घट होणार असून, त्यांना 48.15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला 36. 88 टक्के मतं मिळणार आहेत, असं या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतही सेना-भाजपाच्या जागा घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यातील 48 पैकी 35 जागांवर युती विजयी होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यंदा राज्यात भाजपा-शिवसेना युतीला एकूण 35 जागांवर यश मिळू शकतं.यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 21 जागांवर त्यांना यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र गेली साडेचार वर्षे सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला 14 जागांवर यश मिळू शकतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना 4 जागांवर फटका बसू शकतो. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होईल, असा अंदाज आहे. 2014 मध्ये युतीनं राज्यात 42 (भाजपा-22, शिवसेना-18, स्वाभिमानी-1) जागा जिंकल्या होत्या. त्यात यंदा सात जागांची घट होऊ शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस