शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांचा थेट गृहमंत्र्यांना फोन; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 3:38 PM

भाजप नेत्यांच्या सुरक्षेत ठाकरे सरकारकडून कपात; भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई: ठाकरे सरकारनं राज्यातील भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आहे."ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार"ठाकरे सरकारने फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढले आहे. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी केली आहे. यापुढे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा नसेल. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांनी चिंता व्यक्त केली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपातसुरक्षेत कपात करण्यात आल्यानं ठाकरे सरकारवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. ही टीका सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. माझी सुरक्षा कमी करा, असं पवारांनी देशमुख यांना सांगितलं. 'मी स्वत: सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या,' असं पवारांनी गृहमंत्र्यांना सांगितल्याचं कळतं.युवासेनेच्या वरूण सरदेसाईंवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; ‘या’ दर्जाची सुरक्षा मिळणार

फडणवीसांना आता वाय प्लस सुरक्षारात्री उशिरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.काही मंत्र्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपातकाही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपा