शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित हवे होते पण लाभले ‘चौकशीकार’ गृहमंत्री”

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 12:10 IST

BJP Criticized NCP Anil Deshmukh: राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहतेमेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटलांचा वाढदिवस होत नाही पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.

मुंबई – धनंजय मुंडे(Dhananjay Munde), संजय राठोड(Sanjay Rathod), मेहबुब शेख(Mehboob Shaikh) अशा विविध प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपाने ठाकरे सरकारची कोंडी केली, धनंजय मुंडे, मेहबुब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप तर संजय राठोड यांच्यावर कथित प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला, यातच आता भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP Target Home Minister Anil Deshmukh over Sanjay Rathod Controversy in Pooja Chavan Suicide Case)

राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले, सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहते असा आरोप भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ चौकशी करू असे बोलून क्लीनचिटच दिली, मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटलांचा वाढदिवस होत नाही असंही भाजपाने म्हटलं आहे.

इतकचं नाही तर सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी अभियंत्र्याला निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याचा आरोप झाला होता, या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे, पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.

सीरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ गृहमंत्र्यांनाच माहिती आहे, सीरमला लागलेली आग हे कोणाचे  षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशीही प्रलंबितच राहिली असा चिमटाही भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांना काढला आहे.

त्याचसोबत देशाच्या आर्थिक राजधानीत १२ ऑक्टोबरला वीज पुरवठा अचानक खंडित झाला, राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर सवयीप्रमाणे चौकशीकार गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले, याही प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबितच आहे असंही भाजपाने म्हटलं आहे. या संदर्भात भाजपाने ट्विटरवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेSanjay Rathodसंजय राठोडAnil Deshmukhअनिल देशमुख