शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

देशात हुकूमशाही नको असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवा- भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:13 PM

जळगावच्या सभेत भुजबळांची मोदींवर सडकून टीका

जळगाव : पुन्हा जर भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आले, तर सन २०२४ ची निवडणूक होणार नाही. या देशात हुकूमशाही सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाप्रमाणे या देशाचे मालक बनवले आहे. चौकीदार नाही. तसेच ओबीसींचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. जळगाव जामोद येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. काहीही कारण नसताना माझ्यासह अनेकांना तुरूंगात डांबणाऱ्या भाजपा सेनेला आपण मतदान करणार काय? असा भावनिक सवालही छगन भुजबळ यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला नाही, अशी टीका भुजबळांनी केली.शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. नोटाबंदीने देशातील १ कोटी छोटे उद्योग बंद पडले. मेक इन इंडिया तर दूरच उलट लढाऊ विमानांचा मोठा राफेल घोटाळा या सरकारने केला. गत पाच वर्षात कायदा व सुव्यवस्था धुळीला मिळाली आहे. दिवाळे निघालेल्या अनिल अंबानीला ९ हजार कोटीचे काम देण्यात आले म्हणजेच हे सरकार धनिकांचे आहे. गोरगरीबांचे नाही. महाराष्ट्र सदनाच्या ठेकेदाराला एक रूपयाही आजपर्यंत मिळाला नाही. मग मी त्यामध्ये ८५० कोटींचा भ्रष्टाचार केला हे म्हणणे म्हणजे चक्क शासनाचा खोटारडेपणा आहे. अशा भाजप-सेनेच्या सरकारच्या सत्ता देऊ नका नाहीतर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019jalgaon-pcजळगावChhagan Bhujbalछगन भुजबळNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा