शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 11:43 AM

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.  राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असं राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आठ तारखेला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचं विधान गेहलोत यांनी केलं आहे."

"गेहलोत यांचे हे विधान निराधार आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही" असं भाजपाच्या सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. तसेच राजस्थानात शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी असं देखील म्हटलं आहे. 

"काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी"

राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तरही अशोक गेहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे पूनिया यांनी म्हटलं आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे सांगत असताना मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचं आपल्याला वाटत नाही. शेतात काम करणारे खरे शेतकरी याबाबत चिंतेत आहेत असं आपल्याला वाटत नाही" असं कैलाश चौधरी यांनी म्हटलं आहे.

"आंदोलन करणारे शेतकरी हे खरे वाटत नाहीत", कृषी राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. देशातील शेतकऱ्यांचा नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे. "मला वाटतं की राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि शेतकऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. देशात अशांतता पसरेल असा कोणताही निर्णय शेतकरी घेणार नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कायद्यांमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. जे खरे शेतकरी आहेत, ते आपल्या शेतात काम करत आहेत आणि मला नाही वाचत की ते दु:खी आहेत" असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी