शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

निष्ठावंताची अखेर..., गणपतराव देशमुख... राजकारणाची एक पिढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 09:32 IST

Ganapatrao Deshmukh: एकच झेंडा, एकच पक्ष आणि एक मतदारसंघ घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल ११ वेळा निवडून येऊन ५० वर्षे विधिमंडळात आपल्या राजकारणाने प्रभाव पाडणाऱ्या अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने निष्ठावंत राजकारणाची अखेर झाली.

- समीर इनामदारआमदार होण्याचं प्रत्येक राजकारण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. मात्र, आमदारांच्या वयाइतकी वर्षे विधानसभेत मांड ठोकून राहणं हे दिव्य नसून एक तपस्याच आहे. विधानसभेत ५० वर्षे काम करण्याचा अनुभव असणारे गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण. गणपतरावांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल ११ वेळा विजय संपादन केला. एन. डी. पाटील यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तो त्यांच्या खिशातला (पॉकेटबरी) मतदारसंघ असल्याचं त्यांनी सिद्ध केलेे. नातवाने, वडिलांनी आणि आजोबांनी एकाच व्यक्तीला मतदान करणे ही एक अद्वितीय घटना आहे. ती गणपतराव देशमुख यांच्याच बाबतीत घडू शकते. असा नेता सापडणे दुर्लभ होते. बीए, एलएलबी पदवी मिळविल्यावर आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजाच्या ‘अ‍ॅडव्होकसी’साठी केला. अभ्यासू वृत्ती, चिकटपणा, घेतलेल्या कामाचा वसा टाकायचा नाही, ही ओळख. गोरगरीब शेतकरी त्यांच्याकडे कोर्टाच्या कामासाठी येत असत. त्यावेळी त्यांना त्यांच्यातील गरिबी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा याचे दर्शन घडले. त्यातूनच राजकारणाचा प्रारंभ झाला. सुरुवातीला ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास प्रारंभ केला, त्याच पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेल्या ६० वर्षांनंतरही त्यांना काम करताना पाहता आले. शेतकरी कामगार पक्ष सोडून ते सत्ताधाऱ्यांच्या पक्षात राहिले असते तर कदाचित मोठ्या पदावर पोहोचले असते. मात्र, ज्या निष्ठेने आणि ध्येयाने ते राजकारणात आले, त्याच्याशी त्यांनी कधी प्रतारणा केली नाही.१९६२ साली ते पहिल्यांदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. तत्पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यानंतर १९७२ व १९९५ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर गणपतराव देशमुख यांचेच वर्चस्व राहिले. इंग्रजांनी बांधलेल्या बुद्धेहाळ तलावात त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून गणपतरावांनी १९५८ साली लढा उभारला. त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना झाला. १८९४ सालचा इंग्रजांचा कायदा मोडून काढण्यासाठी त्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले.  सांगोला, जत, आटपाडी, कवठे-महांकाळ, मंगळवेढा, माण हे परंपरेने दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. सांगोला तालुका माणदेशात मोजला जातो. दर तीन वर्षाला दुष्काळाचा तडाखा या तालुक्याने सोसला आहे. या तालुक्यात कोणताही उद्योगधंदा नव्हता. उपासमारी ही पाचवीला पुजलेली. अशावेळी तालुक्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच ध्येय त्यांनी समोर ठेवले. गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्याचा कायापालट करण्यामागे गणपतरावांची भूमिका अग्रेसर राहिली. भौगोलिकदृष्ट्या खडकाळ, माळरानाचा भाग असलेल्या या तालुक्यात १९८० नंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बोर, डाळिंब फळबाग लागवडीचा कार्यक्रम प्रामुख्याने राबविला. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती आणण्याचे काम त्यांनी केले. १९६२-६७, १९६७-७२, १९७४-७८, १९७८-८०, १९८०-८५, १९८५-९०, १९९०-९५, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४ आणि २०१४-१९ या काळात ते निवडून गेले. २०१९ ला त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली. १९७८ साली राज्यात पुलोदचे सरकार आल्यानंतर जुलै १९७८ ते फेब्रुवारी १९८० या काळात त्यांनी कृषी, ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून  काम पाहिले. १९७७ साली ते विधानसभेत विरोधी पक्षनेता होते. पुरोगामी लोकशाही आघाडी शासनामध्ये १९ ऑक्टोबर १९९९ ते मे २००२ पर्यंत पणन, रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून १९९०, २००४ आणि २००९ साली काम पाहिले. त्याशिवाय विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख, विधानमंडळाच्या अंदाज, लोकलेखा, कामकाज सल्लागार, उपविधान, सार्वजनिक उपक्रम, विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Ganpatrao Deshmukhगणपतराव देशमुखPoliticsराजकारण