शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:44 IST

UP Election 2022: भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होतेयापुढे उत्तर प्रदेशात यापुढे असं काही खपवून घेणार नाहीउमा भारतींचे बसप, राम मंदिरावरून टीकास्त्र

लखनऊ: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यातच आता भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे. (up election 2022 uma bharti criticised asaduddin owaisi over politics in uttar pradesh)

उमा भारती म्हणाल्या की, अँटी मजनू स्क्वॉड आठवतंय का, यासंदर्भात ओवेसी यांची बोलती बंद व्हायची. असदुद्दीन ओवेसी यांना एक सभ्य व्यक्ती समजत होते. मात्र, यापुढे उत्तर प्रदेशात असं काही खपवून घेणार नाही, असा इशाराच उमा भारती यांनी दिला आहे. ओवेसी यांनी अलीकडेच म्हटले होते की, उत्तर प्रदेशात लैला बनल्यासारखे वाटत आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजनूसारखे त्यांची आठवण काढत असतात. यासंदर्भात उमा भारती यांनी ओवेसींना सुनावले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मायावती स्वतः बाहेर फिरून चर्चा करत नाही

मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करण्यावरूनही उमा भारती यांनी टीका केली आहे. मायावती स्वतः बाहेर पडत नाही आणि ब्राह्मण संमेलने घेत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राम मंदिर मुद्द्यावरूनही उमा भारती यांनी सतीश मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी जातीने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते. रामलल्लाला त्यांनी साष्टांग दंडवतही घातला. भव्य राम मंदिर होणार यात कोणतेच दुमत नाही. पण, हेच बसपवाले राम मंदिराच्या जागी शौचालय बांधण्याची तयारी करत होते, असा हल्लाबोल उमा भारती यांनी केला. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

भाजपच्या जागा नक्कीच वाढतील

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच जास्त जागा मिळतील. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकUma Bhartiउमा भारतीyogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी