शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:44 IST

UP Election 2022: भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होतेयापुढे उत्तर प्रदेशात यापुढे असं काही खपवून घेणार नाहीउमा भारतींचे बसप, राम मंदिरावरून टीकास्त्र

लखनऊ: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यातच आता भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे. (up election 2022 uma bharti criticised asaduddin owaisi over politics in uttar pradesh)

उमा भारती म्हणाल्या की, अँटी मजनू स्क्वॉड आठवतंय का, यासंदर्भात ओवेसी यांची बोलती बंद व्हायची. असदुद्दीन ओवेसी यांना एक सभ्य व्यक्ती समजत होते. मात्र, यापुढे उत्तर प्रदेशात असं काही खपवून घेणार नाही, असा इशाराच उमा भारती यांनी दिला आहे. ओवेसी यांनी अलीकडेच म्हटले होते की, उत्तर प्रदेशात लैला बनल्यासारखे वाटत आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजनूसारखे त्यांची आठवण काढत असतात. यासंदर्भात उमा भारती यांनी ओवेसींना सुनावले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मायावती स्वतः बाहेर फिरून चर्चा करत नाही

मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करण्यावरूनही उमा भारती यांनी टीका केली आहे. मायावती स्वतः बाहेर पडत नाही आणि ब्राह्मण संमेलने घेत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राम मंदिर मुद्द्यावरूनही उमा भारती यांनी सतीश मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी जातीने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते. रामलल्लाला त्यांनी साष्टांग दंडवतही घातला. भव्य राम मंदिर होणार यात कोणतेच दुमत नाही. पण, हेच बसपवाले राम मंदिराच्या जागी शौचालय बांधण्याची तयारी करत होते, असा हल्लाबोल उमा भारती यांनी केला. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

भाजपच्या जागा नक्कीच वाढतील

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच जास्त जागा मिळतील. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकUma Bhartiउमा भारतीyogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी